मुंबई : भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेला मुंबई पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. केंद्र सरकारची कामं जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी भाजपनं जन आशीर्वाद यात्रा सुरु केली. मात्र या यात्रेवर पोलिसांनी ३६ हून अधिक गुन्हे दाखल केलेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर गर्दी जमवायला परवानगी नसताना देखील भाजपनं जन आशीर्वाद यात्रा काढली. या पार्श्वभूमीवर मुंबईत ३६ ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.
“पुणेकरांनी नाव ठेवण्यात देवांनाही सोडलं नाही”, मोदी मंदिरावरून उपमुख्यमंत्र्यांचा शाब्दिक टोला
१९ ऑगस्ट रोजी विलेपार्ले, खेरवाडी, माहीम, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर, गोवंडी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर आता गुन्ह्यांची संख्या ३६ वर पोहोचली आहे. जन आशीर्वाद यात्रेची परवानगी नसतानाही ती काढल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
शिवसेनेच्या कृतीची फडणवीसांनी केली तालिबानशी तुलना, म्हणाले…
मंगळवारी संध्याकाळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या स्वागतासाठी भाजपच्या नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी महापालिका मुख्यालयापासून जनआशीर्वाद यात्रा काढली होती. या यात्रेत कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने एनआरआय पोलिसांनी आयोजकांसह ७० ते ८० भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केल्याचं समजतंय.
Read Also :
- लायकी नसलेल्या दीडदमडीच्या लोकांनी राज ठाकरेंबद्दल बोलू नये – मनसे
- २५० कोटींच्या कथित घोटाळ्याची चौकशी होणार; अनिल परब यांच्या अडचणी वाढणार?
- पिंपरी चिंचवड लाचखोरी प्रकरणातील दोषींवर कारवाई करणार; चंद्रकांत पाटील यांचे निर्देश
- “राणे कुणाच्या धमक्यांना घाबत नाहीत, ते सेनेला जशास तसे उत्तर देतील”, कराडांचा इशारा
- माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयी “भारतीय लोकशाहीचे आदर्श नेते”- गडकरी