औरंगाबाद – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेनंतर औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. याकरिता भाजपनेही कंबर कसली असून शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. औरंगाबाद येथील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. हे पाहता माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २३ मे रोजी औरंगाबादेत पाणीप्रश्नावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्व आणि मशिदीवरील भोंगे या मुद्द्यावरून १ मे रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात सभा घेतली. त्याच मैदानात उद्धव ठाकरे हेदेखील ८ जूनला सभा घेणार आहेत. तत्पूर्वीच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची त्याच मैदानावर सभा घेण्याची तयारी भाजपने सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.
मोदीजी, आकडों से पेट नही भरता, जब भूक लगती है, तो धान, रोटी लगती है; सुप्रियाताई सुळे
फडणवीस यांच्या पाणीप्रश्नावरील मोर्चानंतर लगेच २८ आणि २९ मे रोजी भाजप प्रदेश कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक औरंगाबादेत होणार आहे. ही बैठक झाल्यानंतर अमित शहा यांची सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर घेण्यासाठी भाजपकडून प्रयत्न करण्यात येत आहे. शहा यांच्या सभेच्या माध्यमातूनच भाजप महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याचीही माहिती आहे.
राज ठाकरे यांना मुस्लिम संघटनांकडून धमक्या; मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांची भेट घेणार
येत्या औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूममीवर भाजपने कंबर कसली असून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. शहरातील पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून भाजप शिवसेनेला घेरण्याच्या तयारीत आहे. या अनुषंगानेच स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांनी आंदोलने, निदर्शने करत वातावरण तापवण्यास सुरुवात केली आहे.
Read also:
- संभाजी राजे राज्यसभेची निवडणुक अपक्ष म्हणून लढविणार; ‘या’ संघटनेची केली मोठी घोषणा
- “टोमणे सभेला अटी-शर्ती आहेत का?”, मनसेचा शिवसेनेला पुन्हा टोमणा
- “हेडलाईन मिळवण्यासाठी नाना पटोलेंचं वक्तव्य”; नाना पटोलेंच्या वक्तव्याला अजित पवारांचं प्रत्युत्तर
- शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन; दुबईवरून पार्थिव आणण्याचे प्रयत्न सुरू
- राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील वाद दिल्लीत जाणार! राष्ट्रवादी-भाजप संबंध उघडे पाडण्याचा पटोलेंचा इशारा