राज्याच्या हितासाठी आम्ही शिवसेनेसोबत येण्यास आजही तयार आहोत, पण जरी एकत्र यायची वेळ आली, तर निवडणुका एकत्र लढणार नाही” असं चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.
शिवसेनेला उपरती झाली, तर येतील, आम्ही काही प्रयत्न करणार नाही. भाजपने हात पुढे केला असे काही अर्थ काढू नका, असं चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले.“केंद्रीय नेतृत्वाने आम्हाला सांगितले आहे, इतके कणखर व्हा, की यापुढे कुठलीही निवडणूक एकट्याने लढवता आली पाहिजे. आताही शिवसेनेला सरकार करायचं झालं तर आम्ही एकत्र येऊ. जर उद्धवजीना वाटले की काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांना बाजूला करु, तर ते केंद्रीय नेतृत्वाला सांगतील”
“बिहारमध्ये जे झालं, ते महाराष्ट्रातही होऊ शकतं. नितीशकुमार यांनी तर लालू प्रसाद यादव यांच्यासोबत निवडणूक लढवली होती आणि सरकार स्थापन केलं. मात्र त्यांना डोकेदुखी झाली आणि एका वर्षात त्यांनी राजीनामा दिला. नंतर भाजपला एकत्र घेऊन सरकार स्थापन केले” असा दाखला चंद्रकांत पाटील यांनी दिला.