मुंबई : राज्यातील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शालेय शिक्षण विभागाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली, तर बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. त्याबाबतची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. मात्र, राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अजूनही मोठ्या प्रमाणात असून, मे महिन्यात परीक्षा घेणे शक्य नाही. त्यामुळे या परीक्षा कधी आणि कोणत्या पद्धतीने होतील, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम होता आता तो संपलेला आहे.
राज्यातल्या बारावीच्या परीक्षा आता रद्द करण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. परीक्षा रद्द कऱण्याच्या शासनाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. आज झालेल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत बारावीच्या परीक्षांबाबत चर्चा झाल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. मात्र, त्याबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना गायकवाड यांनी सांगितलं की, “शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन विभागाला ही फाईल पाठवत आहोत. आज किंवा उद्या त्यांची बैठक होईल.
त्यात ते फाईलवर निर्णय घेतील आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला अतिरिक्त माहिती देऊ. सध्याच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये सर्व निर्णय हे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून घेतले जात आहेत. त्यानुसार आम्ही ती फाईल त्यांच्याकडे पाठवली आहे”. आता या प्रस्तावाला आपत्ती व्यवस्थापन विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे बारावीच्या परीक्षा रद्द करण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. परीक्षा रद्द करण्याची भूमिका आमची पहिल्यापासूनच होती असंही वडेट्टीवार म्हणाले.
परीक्षांसाठी शेवटच्या टप्प्यात तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी किमान १५ ते ३० दिवसांचा कालावधी आवश्यक आहे. त्यामुळे परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होणार की, जूनमध्ये होणार याबाबत कोणतीही सूचना शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आलेली नाही. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) जूनच्या पहिल्या आठवड्यात करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेउन बारावीच्या परीक्षांबाबत निर्णय घेणार आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभाग आणि राज्य मंडळाकडून ‘सीबीएसई’च्या निर्णयाची वाट पाहण्यात येत आहे का, असाही सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
Read Also :
- ‘अखेर फोन टॅपिंग प्रकरणात नोंदवला गेला, रश्मी शुक्लांचा जबाब’
- Big Breaking : दहावीच्या परिक्षांविषयी राज्य सरकार जीआर काढणार
- उजनी पाणी प्रश्न : ‘५ टीएमसी पाण्यासाठी आता पुढचे आंदोलन थेट गोविंदबागेत’
- मराठ्यांपाठोपाठ धनगर समाजही आक्रमक; आरक्षणासाठी ३१ मे’ला जागर करणार
- मदतीचा हात.! कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना भाजपचा ‘आधार’