दिल्ली : मराठा आरक्षणासाठीची पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर राज्यातल्या मराठा समाजामध्ये संतापाची लाट निर्माण झाली. यावरून सत्तेतील महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष असलेला भाजप एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आणि राज्यात पुन्हा एकदा मराठा क्रांती मूक मोर्चाची हाक देण्यात आली. यांनतर संभाजीराजेंनी राज्यव्यापी दौरा करत, काही मागण्या सरकारसमोर ठेवल्या आणि नंतर आंदोलनाचा इशारा दिला.
दरम्यान, या सगळ्या घटनाक्रमाला कारणीभूत असलेल्या १०२ व्या घटनादुरुस्ती विधेयकात बदल केले जावेत, अशी मागणी सातत्याने केली जात होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता, केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून, मराठा आरक्षणाच्या निकालानंतर केंद्र सरकारने १०२ व्या घटनादुरुस्ती विधेयकात बदल केला आहे. या नव्या बदलांना आजच्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी मिळाली.
मागास प्रवर्ग ठरवून आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांना देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळ समितीने मंजूर केला. याबाबत आज केंद्रीय कायदा व न्याय मंत्री किरेन रिजीजू यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली.#मराठा_आरक्षण pic.twitter.com/X3gxBXpZSe
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 4, 2021
मनसे-भाजपच्या राजकारणाला मिळणार दिशा? चंद्रकांत पाटील घेणार लवकरच ‘राज’भेट
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे, विधेयकात बदल करून नवे एसीईबीसी प्रवर्ग बनवण्याचा अधिकार, आता राज्य सरकारांना मिळणार आहे. याबाबतची अधिक माहिती, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीटद्वारे दिली असून, “मागास प्रवर्ग ठरवून आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांना देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळ समितीने मंजूर केला. याबाबत आज केंद्रीय कायदा व न्याय मंत्री किरेन रिजीजू यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली”, असं त्यांनी सांगितलं आहे.
“MPSC सदस्य नियुक्तीची फाईल मंजूर करा”, मागणी घेऊन ठाकरे सरकारचा मंत्री राज्यपाल दरबारी
१०२ व्या घटनादुरुस्तीनंतर, राज्याला एखादी जात मागास ठरवण्याचा अधिकार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायाधीशांच्या बेंचने मराठा आरक्षणाचा निकाल देताना स्पष्ट केलं. तसेच, यामुळे हा अधिकार फक्त राष्ट्रपती, संसद यांच्याकडेच असल्याचंही न्यायालयाने निकालात स्पष्ट केलं, पण केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता हे अधिकार राज्यांना बहाल केले गेले आहेत.
Read Also :
- ‘ज्यांनी भाजपला सोडले त्यांची वाईट परिस्थीती झाली’, शेलारांचा एकनाथ खडसे यांना टोला
- राहुल गांधींचा हात संजय राऊतांच्या खांद्यावर बघून, आख्खी भाजप कामाला लागली; रुपाली चाकणकर यांची खोचक टीका
- पूरग्रस्तांना दिलेले चेक ‘या’ कारणामुळे घेतले परत, अनिल परब म्हणतात…
- झिकाचे संक्रमण नाही, घाबरून जाऊन नका! आरोग्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन
- “आरक्षण गेलं हे पाप भाजपचं”, ओबीसी आरक्षणावरून बावनकुळे-वडेट्टीवार आमनेसामने