मुंबई : मध्यंतरी राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर विचित्र आणि वादग्रस्त टीका करून चर्चेत आलेले बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे परत एकदा त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत.
बुलढाण्यात एका स्थानिक वृत्तपत्रातला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी केलेलं, “या काळात उपास-तापास करण्याची गरज नाही, कारण देवही वाचवायला खाली येणार नाही. स्वत:ची काळजी स्वत:लाच घ्यायची आहे. रोज ४ अंडे खा, दिवसाआड चिकन खा,” असा सल्ला त्यांनी लोकांना दिला आहे. त्यांचे हे विधान छापून आल्यामुळे वारकरी संप्रदायातून नाराजी ओसंडून वाहत असून, अनेकांनी ही नाराजी जाहीररीत्या व्यक्त केली आहे. तसेच त्यांना फोन करून आपली नाराजी व्यक्त करणाऱ्या एका इसमाशी ते अर्वाच्य भाषेत बोला असल्याची ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली आहे.
“तुम्हाला जे वाटायचं ते वाटू दे. मी रोज २०-२५ जणांच्या अस्थी जाळू लागलो, तुमच्या लोकांची श्रद्धा आहे हे मला माहित आहे, पण मी बोलतो ते वास्तव आहे. तुमच्यासारखाच मीही नास्तिक नाही, पण ही काळाची गरज आहे. तुम्ही महाराजांनी वेगवेगळे फोन करू नका. माझ्याकडे वेळ नाही. आमचं लॉकडाऊन ३० मे ला उठतंय, ३१ मे ला तुम्ही सिंदखेडराजाला या, मग आमनेसामने बघू काय होतं? असं संजय गायकवाड बोलत असल्याचं क्लिपमधून ऐकायला मिळत आहे.
दरम्यान, या विधानामुळे संजय गायकवाड यांनी त्वरित माफी मागतली पाहिजे, अशी मागणी जोर धरू लागली असून, राज्यातील सर्व वारकरी मंडळींनी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला आहे.
Read Also :
- काम झटकायचं आणि मंत्रिपद टिकवायचं, हेच आघाडी सरकारमधल्या मंत्र्यांचं काम
- रक्षा खडसेंचे शरद पवारांना पत्र, करून दिली जुन्या वादयाची आठवण
- पत्रकार, कॅमेरामन यांना तात्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा – देवेंद्र फडणवीस
- आम्ही देखील पाहून घेऊ ‘सामना’चा “सामना”, पुढे कसा करायचा!
- उद्धव ठाकरेंना बारामतीची हवा जास्तच मानवलेली दिसतेय; गोड बोलणे आणि पाठीत सुरी खुपसणे