कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या राजकीय संघर्षात गोकुळ केंद्रस्थानी आहे . विधानपरिषद निवडणुकीत पराभव केल्यानंतर पाटील गटाने ‘ गोकुळ उरलंय ‘ असे म्हणत तयारी केली होती . नवख्या उमेदवारांना पाटील आणि मुश्रीफ गटाने उमेदवारी दिली होती . पहिल्या फेरीत विरोधी गटाने राखीव गटातील तीन जागांवर २०० मतांची आघाडी घेतली होती . महिला गटात केवळ १० मतांचा फरक असल्याने येथे चुरस वाढली होती. आता ५ राखीव जागांचे निकाल स्पष्ट झालेले आहेत आणि बंटी पाटील गटाने ५ पैकी ४ जागा जिंकल्या आहेत.
आता खुल्या गटातील उमेदवारांची मतमोजणी करण्यास सुरुवात झालेली आहे.राखीव गटातील १६ पैकी १६ जागांवर आता विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडी आता संपूर्ण आघाडीवर आहे. मोठ्या प्रमाणावर खुल्या गटात क्रॉस मतदानाचा फटका बसलेला आहे. कोणत्याही आघाडी कडून पॅनल टू पॅनल मतदानाचा राजधर्म मतदारांकडून पाळण्यात आलेला नाही. क्रॉस मतदानामुळे आता दोन्ही बाजुंनी धाकधूक वाढलेली आहे. बंटी पाटील-मुश्रीफ गटात मात्र आता आनंदाचे वातावरण पसरले आहे.
१६ पैकी १६ जागांवर बंटी पाटील-मुश्रीफ आघाडीवर असताना त्यांनी तब्ब्ल २५ मतांची आघाडी ठेवण्यात त्यांना यश आलेले आहे. जिल्ह्यातील कार्यकर्ते आता मतमोजणी केंद्रावर येण्यास सुरुवात झालेली आहे. मतमोजणी झाल्यानंतर लगेचच कडक लॉकडाउन होणार आहे. कोणी कितीही शक्ती प्रदर्शन केले तरी विजय हा आमचाच असणार अशा ठाम विश्वास सत्तारुढचे नेते आमदार पी.एन. पाटील यांनी तर, गोकुळच्या निवडणुकीत शंभर टक्के सत्तांतर होणार , असा विश्वास पालकमंत्री सत्तेज पाटील यांनी व्यक्त केला होता . मात्र मतदारांनी बंटी पाटलांच्या पारड्यात जास्त वजन टाकले आहे.