मागील काही दिवसांपासून मुंबईत करोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याची दिलासादायक माहिती समोर आहे. पुढील काही दिवसांमध्ये ती आणखी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर अशीच संख्या कमी होत राहिली तर नक्कीच करोनावर आपण नियंत्रण मिळवल्याचं म्हणता येईल. मुंबईची सद्यस्थिती पाहता हर्ड इम्युनिटीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका सर्वेक्षणात तब्बल ५७ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी तयार झाल्याचं समोर आलं आहे.
सेरो सर्व्हेतून समोर आलेल्या माहितीनुसार सद्यस्थितीला मुंबईकरांची सामूदायिक रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याचं निदर्शनास येत आहे. यालाच हर्ड इम्युनिटी असंही म्हटलं जातं. यावर बोलताना भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेला आणि आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.
यावर ट्विट करताना त्यांनी म्हटलं आहे की, “आरएसएस आणि इतर सामाजिक संस्थांनी दिवस रात्र मेहनत केल्याने धारावी कोरोना मुक्त झाली….मुंबईकरांची सामूदायिक रोगप्रतिकारक शक्ती त्यांच्या प्रयत्नानेच वाढली आहे….पण श्रेय घेत आहेत बीएमसी आणि बेबी पेंग्विन……ये पब्लिक है ये सब जानती हैं!!”
Dharavi corona free – RSS n other Orgs worked day night !
Herd immunity against corona – Mumbaikers developed it on their own!Who is taking credit.. Baby penguin n BMC ???
Yeh Public hai..Ye sab janti hai!!!
— nitesh rane (@NiteshNRane) July 29, 2020