औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार गेल्या दोन दिवसांपूर्वीच झाला. यामध्ये भाजपच्या 9 तर शिंदे गटातील 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये अतुल सावे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ते औरंगाबाद मतदारसंघात दाखल झाले. त्यांचे औरंगाबाद शहरात जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या मतदार संघातील मंत्री पहिल्यांदाच मतदारसंघात येतोय म्हटल्यावर कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळाला. यावेळी अतुल सावे यांनी औरंगाबाद महानगरपालिकेबाबत एक सुचक विधान केलं आहे.
बावनकुळेंकडे भाजप प्रदेशाध्यक्षपद तर मुंबईचे अध्यक्ष म्हणून शेलारांची निवड
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जे. पी. नड्डा, अमित शहा, चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये मला कॅबिनेटमध्ये संधी मिळाली. फडणवीसांनी माझ्यावर विश्वास टाकला, त्याचा वापर मी जिल्हा आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी करणार आहे. औरंगाबाद मतदारसंघात लक्ष घालुन विकास करणार आहे. तर 100 टक्के आम्ही शिवसेना-भाजप मिळून औरंगाबाद महापालिकेवर झेंडा फडकवू, असं अतुल सावे यांनी म्हणत विरोधकांना आव्हान दिलं आहे.
“..म्हणुन मी उद्धव ठाकरेंवर बोलणे टाळतो”; दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण
शपथ घेतल्यानंतर औरंगाबादच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात पाठपुरावा केला आहे. पुढील आठवड्यात बैठक घेणार आहे. पाण्याचा प्रश्न सुटला तर नवीन उद्योग येण्यासाठी प्रयत्न करणार, उद्योग आल्यानंतर बेरोजगारी दूर होईल, अशीही माहिती त्यांनी दिली. वॉटरग्रीडचा प्रश्नही आम्ही सोडवणार आहे, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. तसेच पालकमंत्रिपद कुणालाही मिळो विकास आम्ही करणारच, जो एकनाथ शिंदे, फडणवीसांचा आदेश असेल तो आम्ही मानू, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
“चला आता काँग्रेसला सुध्दा उध्दव ठाकरेंचे मूळ गुण कळू लागले”; मनसेचा खोचक टोला
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पहिल्या टप्प्यात शिंदे गटातील शंभुराज देसाई, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, दीपक केसरकर, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, दादा भुसे, उदय सामंत, संजय राठोड यांना संधी देण्यात आली आहे. भाजपाकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण, सुरेश खाडे, सुधीर मुनगंटीवार, अतुल सावे, विजयकुमार गावित यांना संधी देण्यात आली आहे.
Read also
- “आमदार पुण्याचे, मंत्री पुण्याचे अन् ध्वजारोहण कोल्हापुरला..?”चंद्रकांत पाटलांवर पुणेकरांचा संताप
- “जनतेच्या कृपेने रेल्वे मंत्री झालो, पण अजून माझ्या गावात रेल्वे नाही”
- “मराठी बाणा गुजरात्यांच्या चरणी वाहिला, ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा ?”
- “असे दलबदलू काँग्रेसमध्ये देखील जातील..”; पेडणेकरांचा मुख्यमंत्री शिंदेवर हल्लाबोल
- “बाळासाहेबांचे विचार पुढे न्यायाचे आहे, अन् हे अजूनही खातेवाटपावर अडले आहेत”