ठाणे : मीरा भाईंदर महानगरपालिकेने जैन समुदायांसाठी वेगळे शौचालय बांधण्यासाठी निविदा काढली आहे. त्यावरून राज्यात राजकीय नेत्यांनी यासंदर्भात प्रखर शब्दात टिकास्त्र सोडलं आहे. तसेच याबाबत नागरिकांनी देखील यावर सवाल उपस्थित केला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महापालिकेच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
“ये मीठा है और कडू है..”; सत्तरांचा बच्चू कडूंना टोला
जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, मीरा भाईंदर महानगरपालिकेची ही शौचालय बांधणीची जाहीरात पहा. जैन बांधवांसाठी वेगळे शौचालय बांधण्याचा मनसुबा महानगरपालिकेने घातला आहे. माझा त्यांना रोकडा सवाल आहे की, हिंदु, मुस्लिम, शीख, बौद्ध, इसाई यांच्या साठी पण वेगळे शौचालय बांधणार का ? शौचालया धर्मानुसार बांधणारी एकमेव महापालिका असेल असंही त्यांनी ठणकावून सांगितलं आहे.
“शेतकऱ्यांवर चांगले दिवस येऊ देत”; नवनीत राणांचे गणरायाकडे साकडं
मीरा भाईंदर महानगरपालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. त्याठिकाणी मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा सुपडा साफ झाला होता. त्यामुळेच आता राष्ट्रवादी मीरा भाईंदर महानगरपालिकेवर निशाणा साधताना दिसत आहे.
मीरा भाईंदर महानगरपालिकेची ही शौचालय बांधणीची जाहिरात पहा…
जैन बांधवांसाठी वेगळे शौचालय बांधण्याचा मनसुबा महानगरपालिकेने घातला आहे
माझा रोकडा सवाल आहे__
हिंदू,मुस्लिम,शीख,बौद्ध,इसाई ह्यांच्या साठी पण
वेगळे सौचालाय बांधणार का
सौचालय धर्मा नुसार बांधणारी एकमेव महापालिका असेल pic.twitter.com/2wu9CTzeCn— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 1, 2022
Read also
- “भाजपाची बॅनरबाजी म्हणजे थिल्लरपणा”; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल
- शिंदे सरकारमध्ये 26 कॅबिनेट तर 17 राज्यमंत्री..! दिवाळीपुर्वी घेणार 7 कॅबिनेट तर 17 राज्यमंत्री शपथ
- “बच्चू कडूंना गोड, खरं खार की तिखट द्यायचं हे शिंदे ठरवतील”; अब्दुल सत्तार
- आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बॅनरबाजी
- “शिंदे-फडणवीस सरकारमध्ये रासपला कॅबिनेट मंत्रिपद मिळावं”; महादेव जानकरांची मागणी