मुंबई : गेल्या दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी अचानक दिल्ली स्वारी केली होती. यामध्ये त्यांनी केंद्रीय गुहमंत्री अमित शाह यांना भाजपच्या राज्यातील संघटनात्मक कामाची माहिती दिली. त्यांचे मार्गदर्शन घेतले. तसेच राज्याच्या सहकार क्षेत्रातील विशेषतः साखर उद्योगातील महत्त्वाच्या विषयांबाबतही चंद्रकांत पाटील यांनी अमित शाह यांना माहिती दिली होती.
एसटी आंदोलन पेटले; शेवगाव आगाराच्या 3 एसटी बसेसवर दगडफेक, बसचालक जखमी
कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबार विधानपरिषदेची जागा बिनविरोध करण्यासाठी हा दौरा होता असं देखील बोललं जात होतं. त्याच्या या दौऱ्यानंतर अमित शहा यांनी कोल्हापूरचे भाजपचे नेते आप्पा महाडिक यांच्याशी चर्चा करून कोल्हापूरची जागा बिनविरोध केली होती. यानंतर धुळे-नंदुरबार जागा देखील बिनविरोध झाली होती.
नवाब मलिक यांना आपल्या कृत्यांची जाणीव झाली असेल; प्रविण दरेकरांचा टोला
हे सर्व काही चांगलं झालं असलं तरी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व चंद्रकांत दादा पाटलांवर नाराज असल्याचं खात्रीलायक वृत्त सूत्रांनी दिलं आहे. काल दिल्लीत झालेल्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संघटनमंत्री बी. एल.संतोष यांनी चंद्रकांत पाटील यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारच्या योजना महाराष्ट्रात नीटनेटकेपणाने चंद्रकांत दादांनी पोहोचवल्या नसल्याने पक्षनेतृत्व नाराज आहे. एवढंच नाही तर महाविकास आघाडी सरकारला देखील त्यांना रोकठोक उत्तर देता येत नाही असं देखील पक्ष नेतृत्वाचं म्हणणं आहे.
‘त्यांच्या बुद्धीला जे वाटलं ते ते बोलले’; अजित पवारांचा नारायण राणेंना टोला
गेल्या काही दिवसात चंद्रकांत पाटील राज्य भाजपचं नेतृत्व करत असताना त्यांचा कारभार सर्वसमावेशक नसल्याच्या तक्रारी होत्या. हाच धागा पकडून काल झालेल्या तीन तासांच्या बैठकीत दिल्ली हायकमांडने चंद्रकांत पाटील यांची शाळा घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यातील महा विकास आघाडी विरोधात रान उठवण्यात अपयश आल्याचेही भाजपच्या हायकमांडने निदर्शनास आणून दिले. येणाऱ्या काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी कार्यपद्धतीत सुधारणा करावी अशा सूचनाही भाजपा हायकमांडने दिल्या आहेत.
Read Also :
- महाराष्ट्रावर कितीही संकटे आली तरी सरकार खंबीर; मुख्यमंत्र्यांनी जनतेला लिहलं खास पत्र
- महाराष्ट्रावर कितीही संकटे आली तरी सरकार खंबीर; मुख्यमंत्र्यांनी जनतेला लिहलं खास पत्र
- संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर आजपासून कठोर कारवाई; राज्यात ९३७ बसेस धावल्या रस्त्यावर
- ‘रेकॉर्ड ब्रेक’ उपक्रम : ‘रिव्हर सायक्लोथॉन’द्वारे इंद्रायणी नदी स्वच्छता जनजागृती
- राज्यात पुन्हा निर्बंध लागू, सरकारची नवी नियमावली जाहीर… वाचा सविस्तर…