मुंबईसह कोकण-गोव्यामध्ये १४ व १५ जुलैला मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता स्कायमेटने सांगितली आहे. तसेच येत्या काही तासात विदर्भ, मराठवाड़ा व मध्य महाराष्ट्रातील काही भागात मोठा पाऊस होण्याची शक्यता सांगण्यात आली आहे. मान्सून महाराष्ट्रात पोहोचला आहे.
मान्सूनचा एक तृतीयांश कालावधी संपला असून देशात नेहमीपेक्षा १४% जास्त पाऊस झाला आहे. देशाच्या एकूण क्षेत्रापैकी सुमारे ८५% क्षेत्रात सामान्य किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला आहे
केवळ १५% क्षेत्रामध्ये कमी पाऊस पडला आहे. पण खरी कसोटी आता आहे कारण जुलै आणि ऑगस्टमधील पावसाळ्याचा कल खरीप पिकांचे उत्पादन निश्चित करते.
काही दिवसांपासून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा अन् विदर्भाच्या काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये नुकताच चांगला पाऊस झाला आहे.