मुंबई : काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, ‘मला माजी मंत्री म्हणू नका, २-३ दिवसांत कळेल,’ असं विधान केल्यांनतर राज्यात चर्चांना उधाण आले होते. त्यांच्या वक्तव्यांनंतर मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमात, मंचावर उपास्थित भाजप नेत्यांकडे पाहून, त्यांचा ‘भावी सहकारी’ असा उल्लेख केला. या नेत्यांनी एकामागोमाग एक केलेल्या वक्तव्यांनंतर मात्र राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.
राष्ट्रवादीच्या विळख्यातून बीडला मुक्ती देऊ! प्रीतम मुंडेंचा निर्धार
यांनतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या एका विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, ‘चंद्रकात पाटील आणि रावसाहेब दानवे पाटील हे कदाचित भाजप सोडून शिवसेनेत जाण्याची शक्यता असेल. कारण अलिकडेच शिवसेनेत गडबड चालू होती, काही नेते सेनेत यायला उत्सुक असल्याचं समजलं. मग, ते कदाचित दानवे आणि पाटील हेच असतील. त्यामुळेच, मुख्यमंत्र्यांनी ते सूचक विधान केलं असावं,’ असं ते म्हणाले आहेत.
कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांचा होणार सर्व्हे; उपमुख्यमंत्र्यांचे आदेश
दरम्यान, शुक्रवारच्या सगळ्या राजकीय धुराळ्यानंतर शनिवारी नंदुरबारमध्ये एका कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील एकाच गाडीतून आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादमध्ये केलेल्या व्यक्तव्यानंतर आजच फडणवीस-पाटील एकाच गाडीतून आल्याने पुन्हा एकदा राजकीय तर्कविर्तकांना उधाण आले होते.
मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानावर राष्ट्रवादी नाराज? राऊतांचं स्पष्टीकरण
दुसरीकडे, सत्तेतील महाविकास आघाडी सरकार लवकरच पडेल, अशा आशयाची विधाने विरोधकांकडून अधूनमधून केली जातात. मात्र, दुसरीकडे “असं काहीही घडणार नाही” म्हणत “हे सरकार २५ वर्षे चालेल” असा दावा प्रत्युत्तरादाखल सत्तेतील नेत्यांकडून केला जातो. यातच, आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यामुळे, नेत्यांची वक्तव्ये आणि सध्याची परिस्थिती बघता राज्याच्या राजकारणात काहीही घडू शकते, हे नक्की!
Read Also :