पुणे : आमच्याविरुद्ध तीन पैलवान एकत्र आले, तरीही पुणे महापालिका आम्हीच जिंकणार, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून पुणे महापालिका व युवा स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या पेहेलवान जीमचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले़. त्यावेळी ते बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, पुणेकर जनता आमच्या बरोबर आहे, त्यामुळे आमच्या विरुद्ध तीन तीन पैलवान एकत्र आले तरी आम्ही पुण्याची महापालिका जिंकू. याबद्दल माझ्या मनात शंका नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणा प्रकरणावर देखील भाष्य केले. मराठा आरक्षण प्रश्नी केंद्राचा काही रोल नाही. हा राज्याचा विषय आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जो बदल केला आहे, तो केंद्राने कायदा करण्याच्या अगोदर केलेला आहे, असे ते म्हणाले.
Read Also :
- राजकारणातील घराणेशाही लोकशाहीचा सर्वात मोठा शत्रू, मोदींची काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका
- उद्योगांचे वीजदर कमी करण्यासाठी प्रयत्न करणार, ऊर्जामंत्र्यांची ग्वाही
- कोरोनाच्या लढाईत पंतप्रधान मोदींचे काम जगात सर्वोत्तम – फडणवीस
- ‘त्या’ खुलाशानंतर धनंजय मुंडेंचे पहिले ट्विट…
- धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप, नवाब मलिक म्हणाले…