राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस नेते आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतल्याने अशोक गहलोत सरकार अडचणीत आलं आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील तणाव वाढल्याने राजस्थानमधील काँग्रेस सरकारवर संकट आलं आहे. त्यामुळे राजस्थानातील काँग्रेस सरकार अल्पमतात येईल की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
राजस्थानमधील या राजकीय घडामोडींवर चंद्रकांत पाटील यांनी देखील भाष्य केले आहे. ते म्हणाले,”, “त्या पक्षातील आमदारांना किंवा नेत्यांना आपला पक्ष कमकुवत वाटत असेल. त्यांच्या भविष्याबद्दल विश्वास द्यायला त्यांचा पक्ष कमी पडला असेल. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास असेल. सचिन पायलट भाजपमध्ये आले की नाही हे एक-दोन दिवसातच स्पष्ट होईल.”
दरम्यान, सचिन पायलट यांना काँग्रेसच्या ३० आमदारांचे समर्थन मिळाले, जर त्यांना या आमदारांची साथ मिळाली आणि त्यांनी तिसरी आघाडी बनवली तर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या सरकारचं नुकसान होऊ शकतं. पण तिसरा गट बनवण्यासाठी त्यांना काँग्रेस पक्षाच्या एक तितृयांश आमदारांचे पाठबळ लागणार आहे. सध्याच्या परिस्थितीत सचिन पायलट यांना ३५-४० आमदारांचे समर्थन लागेल जे आव्हानात्मक असणार आहे.