कोल्हापूर : कोल्हापूरला जाऊन मुश्रीफ यांचे आणखीन काही घोटाळे बाहेर काढणार,’ असे म्हणणाऱ्या सोमय्या यांना, पोलिसांकरवी त्यांच्या घरीच स्थानबद्ध करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला गेला. त्यांनतर या कारवाईला झुगारून त्यांनी रेल्वेने कोल्हापूर गाठण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी त्यांना कराडमधेच गाठून थांबण्याची विनंती केली. रविवारी घडलेल्या या घटनेचे सोमवारी देखील पडसाद उमटत असून, त्यामुळे राज्यातील वातावरण तापलेले आहे.
कायद्याची लढाई कायद्याने लढा, कायद्याची लढाई कोल्हापुरी चपलेने लढू नका. कोल्हापुरी चप्पल दाखवणे सोप्पे आहे, पण ईडीला फेस करणे कठीण आहे. तोंडाला फेस येईल ! pic.twitter.com/5rAJHHO7IN
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) September 20, 2021
दरम्यान, या सर्व प्रकरणावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तरं दिली असून, ‘कायद्याची लढाई कायद्यानं लढा! ती कोल्हापुरी चप्पलेनं लढू नका! चप्पल दाखवणं सोप्पं आहे, ईडीला फेस करणं कठीण! तोंडाला फेस येईल,’ असा टोला मुश्रीफ यांना लगावला आहे. ‘पॅनिक होऊन काही होत नाही. ,माझे मित्र मुश्रीफांनी शांत डोक्यानं काम करावं,’ असं म्हणत, ‘माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही,’ अशी खोचक टीका देखील पाटलांनी केली आहे.
हसन मुश्रीफांना माझे नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही. ते कसेही असले तरी माझे मित्र आहेत. त्यांच्या झोपेला एक गोळी न घेता माझे नाव पुरणार असेल तर त्यांच्या गोळीचे पैसे वाचवणे ही मित्र या नात्याने माझी जबाबदारी आहे ! pic.twitter.com/eI0jzQn0hZ
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) September 20, 2021
यावेळी, मुश्रीफांच्या आरोपांना उत्तर देताना, ‘कारखान्यांमध्ये ज्या कंपन्यांतून ९८ कोटी आले, त्या कंपन्या कुठे आहेत, यावर बोला. त्यांनी कोलकातामधून सेनापती घोरपडे कारखान्यात कशी गुंतवणूक केली, त्यावर तुम्ही बोला,’ असा सल्ला देत, ‘‘मुश्रीफांना कोणतीही ऑफर नव्हती. एखाद्याला ऑफर दिली आणि त्याने ती नाकारली, तर ती मेरिटवर नाकारतात. त्यांना त्रास देण्याची आमची संस्कृती नाही. त्यांनी हे नाटक बंद करावं आणि कायद्याची लढाई कायद्याने लढावी,’ असं उत्तर दिलं. ‘चंद्रकात दादांनी मला भाजपत यायची ऑफर दिली. पण मी ती नाकारली. त्यानंतरच या आयकर विभागाच्या धाडी झाल्या,’ असा दावा मुश्रीफ यांनी केला होता.
महाविकास आघाडी सरकारमध्ये पैसे खाण्याव्यतिरिक्त कोणालाच काही कळत नाही. कुठल्याही कामात सरकारमध्ये समन्वय नाही. एकमेकांचे हिशेब चुकते करण्यावरच यांचा भर आहे. सगळाच बेभरवशी कारभार चालू आहे. या सरकारमुळे गेल्या १९ महिन्यांत राज्यातील सर्व व्यवस्था कोलमडवल्या आहेत ! pic.twitter.com/TJEZbmvCso
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) September 20, 2021
तसेच, ‘महाविकास आघाडी सरकार स्थापन होतानाच मी उद्धव ठाकरेंना सल्ला दिला होता, ‘राष्ट्रवादीकडे गृहखातं देऊ नका. आता तुम्ही अवस्था बघताय. CP गायब आहेत, अनेक पोलीस जेलमध्ये आहेत. १९ महिन्यात सगळ्या व्यवस्थांची त्यांनी वाट लावून टाकली,’ असा आरोप पाटील यांनी केला. ‘घोटाळ्यात राष्ट्रवादी-शिवसेनेचेच आमदार सापडत आहेत, असं काहींना वाटतंय. पण आता दोन काँग्रेसच्याही नेत्यांची नावे आली आहेत. दोनच दिवसात त्यांचेही विषय समोर येतील,’ असं विधान करून पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे.
Read Also :
- देवेंद्र फडणवीस दबंग नेते, १०० अजित पवारांना खिशात घालून फिरतात – चंद्रकात पाटील
- कुणी ऑफर दिली मुश्रीफांसाहेबांना? आम्ही काय ऑफर लेटर घेऊन फिरत असतो काय? – फडणवीस
- ‘पुढच्या आठवड्यात मुश्रीफांचा तिसराही घोटाळा बाहेर आणणार!’
- उद्धव ठाकरे अन् रश्मी ठाकरेंच्या बेनामी मालमत्तेच्या चौकशीसाठी अलिबागला जाणार – किरीट सोमय्या
- २ काँग्रेस नेत्यांचेही घोटाळे बाहेर येणार! पाटलांच्या विधानाने खळबळ