मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी, ठाकरे सरकारच्या ११ घोटाळेबाज नेत्यांची नावे सांगितली होती. त्यांनतर आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन त्यांनी, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यवर १२७ कोटीच्या घोटाळ्याचे आरोप केले. तसेच, या घोटाळ्यांचे तब्बल २७०० पानी पुरावे आपण आयकर विभागाकडे सादर केल्याचं सांगितले. तसेच, फक्त तेच नाही, तर त्यांच्या पूर्ण कुटुंबाच्या नावे हे पुरावे आहेत आणि यासंदर्भात मंगळवारी ईडीकडे अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याचं ते म्हणाले.
‘माणसाच्या हवसवृत्तीने टोक गाठले, क्रूरकर्त्याला देहदंडाची शिक्षा द्या’
दरम्यान, या आरोपानंतर आता राज्यातील राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. यावरून मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर देताना, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांच्यावर आरोप केला आहे. त्यावर आता पाटील यांनी पलटवार केला असून, ‘मुश्रिफांसाठी माझं नाव म्हणजे झोपेची गोळी आहे. माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. ते १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. त्याऐवजी त्यांनी ५०० कोटींचा दावा दाखल करावा,’ असा सल्ला त्यांनी दिला आहे.
‘बार्टीच्या योजनांना निधी कमी पडू दिला जाणार नाही,’ धंनजय मुंडेंचा निर्वाळा
‘पाटील यांच्यावरच्या हायब्रीड अन्यूईटी रस्ते घोटाळ्याबाबत मी लाचलुचपत विभागाकडे तक्रार करणार आहे.’ असा आरोप मुश्रीफांनी केला होता. त्यावर उत्तर देताना, ‘ब्रीड अन्यूईटी मध्ये ३० हजार कोटीची कामं निघाली. सरकारकडे पैसे नसल्याने २ वर्ष ६० % आणि ४० % अशी कामं होती, ती काम पूर्ण होत आहेत. यात जी कामं झाली ती नॅशनल लेव्हलची झालेत. आता ती थांबवायला हवी होती, तर तुम्ही का थांबवली नाहीत?’ असं म्हणत, ,आरोपांमध्ये बूड असेल तर कारवाई करा, मी घाबरत नाही,’ असा आव्हान त्यांनी दिलं आहे.
मुख्यमंत्र्याची अनुसूचित जाती आयोगाला ग्वाही, ‘पीडितेच्या मुलांना वाऱ्यावर सोडणार नाही!’
दरम्यान, सोमैयांच्या आरोपांनंतर मुश्रीफ यांनी, ‘मला माहिती होतं, माझ्यावर कधीतरी बिनबुडाचे आणि खोटे आरोप केले जातील. सोमय्यांनी केलेल्या घोटाळ्याच्या आरोपाचा मी तीव्र निषेध करतो. त्यांनी दाखवलेली कागदपत्रे संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. मागच्या वेळेच्या निवडणुकीपूर्वी माझ्या घरांवर धाड टाकली गेली होती. त्यात काहीच आढळले नव्हते. आता यांनी मनीलाँडरींगचा आरोप केला आहे. हा शोध त्यांनी कुठून लावला? कदाचित त्यांना बिचाऱ्यांना काहीच माहिती नसावं,’ असा हल्लाबोल केला आहे.
Read Also :
- अबब…! कागलमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकार्त्यांनी काढली किरीट सोमय्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा
- मोठी बातमी: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे ५ ऑक्टोंबरला मतदान, निवडणुक आयोगाची घोषणा
- ‘पक्षात नेते कमी अन् कारभारीच जास्त,’ राष्ट्रवादीला नेत्यानेच दिला घरचा आहेर
- ‘इतरांच्या पोरांकडे बोट दाखवताना तुमचा मुलगा काय करतो ते पाहा,’ मलिकांचा घणाघात
- साकीनाका बलात्कार: पीडितेच्या कुटूंबीयाला २० लाखाची मदत, अॅट्रोसिटीचा गुन्हाही दाखल