पुणे : तब्बल ८ वर्षांनंतर बेळगाव महापालिकेवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर, पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे, तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. ‘खोटं बोल पण रेटून बोल. सकाळी एक बोल दुपारी एक. कदाचित राऊत यांना अल्झायमर झाल्याची ही सुरुवात आहे. त्यामुळेच त्यांच्या आपण काय बोलले हे लक्षात राहिलं नसावं,” अशी टीका त्यांनी केली आहे.
बेळगाव महापालिकेत भाजपचा दणदणीत विजय; राज्यातील निवडणुकीत महाविकास आघाडीला फटका बसणार?
तसेच, बेळगाव महापालिका निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी थेट शिवसेनेला इशारा देत, ‘बेळगाव झांकी आहे की नाही माहिती नाही, पण मुंबई बाकी आहे’ हे तर नक्कीच आहे आणि आम्ही ती सोडणार नाहीत. हैदराबादच्या वेळीही आम्ही म्हटलं होतं. तिथे थेट आम्ही ५१ वर गेलो. तेव्हा ज्या स्टाईलने आम्ही हैदराबाद लढलो, त्याच स्टाईलने मुंबई लढणार,” असं थेट आव्हान त्यांनी शिवसेनेला दिलं. बेळगावात निम्म्यापेक्षा जास्त भाजपचे मराठी भाषिक नगरसेवकच जास्त निवडून आले आहेत,” असं त्यांनी सांगितलं.
मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाज वाटत नाही; तोंडघशी पडलेल्या संजय राऊतांचा संताप
संजय राऊत यांनी, “एकीकरण समिती मराठी माणसांची प्रातिनिधीक संघटना आहे. त्यांचा पराभव झाला म्हणून काही लोक महाराष्ट्रात पेढे वाटत आहेत. मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाज वाटत नाही!” असा संताप व्यक्त केला. त्यावर प्रतिक्रिया देताना पाटील यांनी, “‘ज्यावेळी परिणाम चांगले असतात, त्यावेळेला ईव्हीएम चांगलं असतं आणि ज्यावेळी निकाल आमच्या बाजूने असतो, तेव्हा त्यांना ईव्हीएममध्ये घोटाळा वाटतो. हे स्वभावानुसारच आहे’, असा टोला पाटील यांनी लगावला आहे.
राष्ट्रवादीने पाळली पडत्या फळाची आज्ञा, गर्दी होईल असे सर्व राजकीय कार्यक्रम टाळणार
आजच्या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे, तर महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाला. त्यांना अवघ्या 3 जागांवर समाधान मानावं लागलं. तसेच, धारवाड महापालिकेतही भाजपने विजय खेचून आणल्याने, निवडणुकीतील या विजयांमुळे भाजपला बळ मिळाले आहे. त्यामुळे, आता आगामी मुंबई महापालिका आणि इतर महापालिकांत भाजप इतर पक्षांना वरचढ ठरते की महाविकास आघाडीतील घटक पक्ष भाजपला मात देतात, याकडे सर्वांचेच लक्ष असेल.
Read Also :
- सरकारने विश्वास संपादन करावा, त्यांच्यावर लोक विश्वास ठेवायला तयार नाही- राजू शेट्टी
- विधानसभा पराभूत उमेदवारांवर मोठी जबाबदारी? पवारांनी बोलावली महत्त्वाची बैठक
- महाराष्ट्र तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर; सण, उत्सव नंतरही साजरे करू शकतो; मुख्यमंत्र्यांच कळवळीच आवाहन
- “एक अनिल जेलच्या दरवाजात, तर दुसरा मुहूर्त शोधतोय,” किरीट सोमय्यांचा घणाघात
- पडळकर खऱ्या बापाची औलाद असतील तर त्यांनी आरोप सिद्ध करावे, वडेट्टीवारांचे आव्हान