मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मनसे-भाजप युतीच्या चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची, सकाळी ११:३० वा. ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांत सव्वा तास खलबतं झाली. त्यामुळे, पूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिली होती; की या बड्या नेत्यांत कोणत्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली?
भविष्यात भाजपा-मनसे युती होणार का? राज ठाकरेंच्या भेटींनंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान
दरम्यान, या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना, या भेटीत काय चर्चा झाली याचा तपशील सांगितला. यावेळी त्यांनी, राज ठाकरेंच्या अंगणातून थेट शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. “मुंबईत सेनेची ताकद असेल तर संजय राऊत यांनी आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सेफ जागेवरुन लढावं आणि ती जिंकून दाखवावी”, असं आव्हान दिलं आहे.
मनसे नेत्याची मोठी प्रतिक्रिया, “मनसे आणि भाजप एकत्र आले तर आनंदच!”
“मराठीमध्ये म्हण आहे, दंड थोपटले…. त्यामुळे राऊतांनी निवडणुकीत उतरुन एकदा आपले दंड चेक करावेत आणि क्षमताही तपासून घ्यावी”, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. भाजप-मनसेने एकत्र येऊन लढून दाखवावं, अशी आव्हान संजय राऊत यांनी राज ठाकरे-चंद्रकांत पाटील भेटीवर बोलताना व्यक्त केली होती. त्यावरच चंद्रकांत पाटलांनी राऊतांवर थेट टीका करत, आपले दंड तपासण्याचा सल्ला दिला आहे.
राज ठाकरेंची भेट घेण्याआधी चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान
या भेटीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटलांनी सांगितले, “बैठकीत युती बाबत कुठलीही चर्चा झाली नाही. पण राजकीय चर्चा झाली असं म्हणता येईल. आम्ही एकमेकांच्या भूमिकेांविषयी चर्चा केली. त्यांच्या परप्रातीयांद्दलच्या भूमिका मी समजून घेतल्या. कुणाच्याही २ भूमिका असतात, मला या भेटीत माणूस म्हणून त्यांच्या भूमिकांवर चर्चा करायची होती, तशी ती झाली. राज ठाकरे पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या अजेंड्यावर काम करणार आहेत”, असं त्यांनी सांगितलं.
पेगासस हेरगिरी प्रकरण: होत असलेले आरोप गंभीर, सत्य बाहेर यायला हवं – सर्वोच्च न्यायालय
त्यामुळे, येत्या काळात महापालिका निवडणुका ऐन तोंडावर असताना, हे दोन पक्ष आपली युती जाहीर करणार का? की या निवडणुकीत स्वतःच पक्षीय बलाबल जोखून आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने त्यांची तयारी आणि मोर्चेबांधणी सुरु आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत्या काळात दोन्ही पक्षांच्या विधानांवरून आणि ठोकताळ्यावरून मिळेलच. मात्र आजच्या भेटीमुळे नक्कीच सत्ताधारी पक्षांच्या मनात कुठेतरी शंकेची पाल चुकचुकली असेल, हे नक्की!
Read Also :
- मोठी बातमी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ताफ्यातील ३ गाड्यांचा अपघात
- मोठी बातमी : राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदललं, आता “या” नावाने पुरस्कार
- मुंबईतील लोकल ट्रेनसाठी आंदोलन करणाऱ्या प्रवीण दरेकर यांच्यावर दंडाची कारवाई
- “नावं बदलायची सोडून भाजप देशात विकासाठी काही करणार का?” काँग्रेसने घेतला आक्रमक पवित्रा
- केंद्र सरकार लोकशाहीचे चारही स्तंभ मोडीत काढायला निघाले; संजय राऊतांची घणाघाती टीका