मुंबई : महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये सध्या जोरदार आरोप-प्रत्योपांची मालिका सुरू आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आज भाजपने आझाद मैदानावर ठोक मोर्चोचे आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चामध्ये भाजपचे अनेक नेते सहभागी झाले होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला. तसेच त्यांनी ठाकरे सरकारचे दाऊदशी काही संबंध आहेत का ?असा सवाल देखील उपस्थित केला आहे.
फोन टँपिंग प्रकरणावर उपमुख्यमंत्र्याचं संजय राऊतांना प्रत्युत्तर, म्हणाले…
महाविकास आघाडीतील माजी मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा पक्षाने दबावात आल्यानंतर त्वरीत घेतला. तर अनिल देशमुखांच्या बाबतीत उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर त्यांचा राजीनामा घेतला गेला. आता नवाब मलिकांना न्यायालयीम कोठडी सुनावल्यानंतर राजीनामा घ्यायचा निर्णय झाला, पंरतु हा निर्णय थोडया वेळात कुणाच्या दबावामुळे बदलला ? तर निर्णय दाऊदच्या दबावामुळे बदलण्यात आला, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
गोव्याच्या रश्मी शुक्ला कोण? संजय राऊतांनी केंद्रीय यंत्रणांचे काढले वाभाडे
चंद्रकांत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, नवाब मलिकांना अटक झाल्यानंतर राज्यात आंदोलनांमध्ये त्यांचा पुतळा जाळला. आता देखील अधिवेशन सुरू असताना मुंबईत मोर्चा काढण्यात आलाय असंही ते म्हणाले. त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना शह देण्यासाठी हा मोर्चा काढला असल्याचंही म्हटलं आहे. तसेच ये तो बस एक अंगडाई है, आगे और लडाई है. असं म्हणत राज्यभर आम्ही लढा उभारू आणि तुमचं जगणं मुश्किल करून टाकू, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
महाराष्ट्र पॅटर्नचे जे प्रमुख होते, तेच निवडणूक काळात गोव्यात; फोन टँपिंगवरून संजय राऊतांचा टोला
नवाब मलिक हटाओ देश बचाओ अशा घोषणा देत भाजपने आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितले की, जो पर्यंत नवाब मलिक यांचा राजीनामा घेत नाही. तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असं म्हटलं आहे. तर राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष नवाब मलिकांच्या बाजूने उभा राहिला आहे. त्यामुळे आगामी काही काळात राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापण्याची शक्यता आहे.
Read also:
- अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात भाजप माहीर! फडणवीसांच्या राजकीय बॉम्बवर रोहित पवारांची प्रतिक्रिया
- नवाब मलिकांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही शातं बसणार नाहीत! फडणवीसांचा हल्लाबोल
- नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा मोर्चो ! फडणवींसासह अनेक भाजप नेते आझाद मैदानावर
- गिरीश महाजन यांना उच्च न्यायालयाने फटकारलं ! 10 लाख रूपये देखील जप्त करण्याचे दिले आदेश
- व्हिडीओ क्लिपमध्ये ते मोठे साहेब कोण? शरद पवारांनी दिलं स्पष्टीकरण