मुंबई – देशात आता ५ राज्यांमध्ये निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. मतदान जरी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये होणार असलं तरी पाचही राज्यांच्या निवडणुकांचा निकाल हा १० मार्च रोजी लागणार आहे. या पाचही राज्यांच्या निवडणुकांसाठी राजकारण चांगलेच पेटलेले दिसत आहे.
महाराष्ट्रात सत्तेत असणारी शिवसेना आता भारतीय जनता पक्षाला इतरही राज्यांमध्ये कडवी झुंझ देण्याची शक्यता आहे. गोवा आणि उत्तरप्रदेशमध्ये शिवसेना आपले उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत हे गोव्यात शिवसेनेची कमान सांभाळणार आहे.
…तर प्रश्न विचारायला फार अक्कल लागत नाही; आशिष शेलारांच मुख्यमंत्र्यांना प्रत्यूत्तर
आज सकाळी संजय राऊत यांनी गोव्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर भाष्य केले आहे. शिवसेना गोव्यात पूर्ण ताकदीने लढणार आहे. काँग्रेस पक्षासोबत शिवसेनेची चर्चा सुरु होती. मात्र त्यांना काहीतरी मजबूरी असल्याने त्यांनी आमच्याशी युती करण्यास नकार दिला आहे. मात्र शिवसेना तरीही पूर्ण ताकदीने गोव्यात लढणार आहे.
गोव्याचे राजकारण हे नेहमीच १० ते १२ मुख्य व्यक्तींच्या मागे फिरत आहे. हे लँड माफिया आहेत, ड्रगझ माफिया आहेत. यावेळी मात्र शिवसेना नक्कीच गोव्यात सगळ्यांना धक्का देणार यात शंका नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील संजय राऊत यांनी चिमटे काढले आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सर्वात जास्त गरज सध्या दिल्लीत आहे त्यामुळे त्यांनी दिल्लीत राहावे.
राजेश टोपेजी तुम्ही डॉक्टर आहात, मग इंदुरीकरांना दरवेळी का पाठीशी घालतायं? तृप्ती देसाई
चंद्रकांत पाटलांवर देखील संजय राऊतांनी टीका केली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे काही महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राचे केंद्रबिंदू नाहीत. त्यांनी काही म्हटलं तरी आम्हाला काही फरक पडत नाही. भाजपची सत्ता केंद्रात आहे.
सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी भारत-चीनचा जो काही वाद सुरु आहे त्यावर लक्ष द्यावं. तिकडं त्यांची जास्त गरज आहे. महाराष्ट्रात आमची सत्ता आहे आणि आम्ही सगळ्या गोष्टींसाठी खंबीर आहोत असं देखील राऊत यांनी म्हटलं आहे.
Read also:
- “मुख्यमंत्री साहेब प्रश्न विचारायला नाही तर सोडवायला अक्कल लागते”; चित्रा वाघ यांचा ठाकरेंना सणसणीत टोला
- ठाण्यात खारेगाव रेल्वेच्या पुलाच्या कामाच्या श्रेयवादावरून राष्ट्रवादी-सेनेत जुंपली
- नागवडे सहकारी साखर कारखान्यात आमदार बबनराव पाचपुते गटाचा दारुण पराभव; राजेंद्र नागवडेंनी २१च्या २१ जागा जिंकल्या
- फडणवीसांचा एक मास्टरस्ट्रोक आणि महेश लांडगेंची गोव्यात एन्ट्री
- दुकानांवरील मराठी पाट्यांना केवळ भाजप समर्थकांचा विरोध; मंत्री नवाब मलिकांचा आरोप