मुंबई : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलेली ‘शक्ती कायद्या’बाबतची घोषणा आणि राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, “परप्रांतीयांची नोंद ठेवावी लागेल” असं केलेलं वक्तव्य, यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
राज्यातील ‘असुरक्षित’ सावित्रीच्या लेकींसाठी अखेर मुख्यमंत्री आले धावून
‘शक्ती कायद्याला सगळ्यांनीच पाठिंबा दिला पाहिजे. पण, याआधीच्या महामारीच्या काळात देखील राज्य सरकारला शक्ती कायद्यावर बैठक करता आली असती, जर तुम्ही एकत्र बैठक करायला घाबरत होतात, तर व्हर्च्युल बैठक करायची होती. तुम्हाला बंदी होती का?,’ असं म्हणत महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
महिलांची सुरक्षा कशी करणार? मुंबई पोलीस आयुक्तांनी दिल्या १० महत्त्वाच्या सूचना
त्याचसोबत, ‘शक्ती कायदा हा आता खूप ऐरणीवर आलेला विषय आहे. राज्यातील महिला आयोगाला अध्यक्ष असायला पाहिजे हासुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे”, असं विधान त्यांनी केलं. मुख्यमंत्र्यांनी परप्रांतीयांच्या संदर्भाने, ‘परप्रांतीयांची नोंद ठेवावी लागेल’ असं वक्तव्य केलं. त्यावर, परप्रांतीयच असे गुन्हे करतात का? राज्यातील माणूस करत नाही का?,’ असा सवाल केला आहे.
मुख्यमंत्र्याची अनुसूचित जाती आयोगाला ग्वाही, ‘पीडितेच्या मुलांना वाऱ्यावर सोडणार नाही!’
दरम्यान, साकीनाका परिसरात घडलेल्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या बलात्काराच्या घटनेनंतर राज्यातील महिला आणि विरोधी पक्ष आक्रमक झाले असून, त्यांनी सरकारकडे या पार्श्वभूमीवर, महिलांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ योग्य ती पावलं उचलण्याची आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृतींना आळा बसण्यासाठी कठोर कायदे लागू करण्याची मागणी केली आहे.
Read Also :
- हसन मुश्रीफांना कोणी ओळखत नाही, पेपरमध्ये बातमी यावी म्हणून, माझ्यावर आरोप करतात – समरजीत घाटगे
- ‘…तर महाराष्ट्रावर येऊ शकतं अंधाराचं राज्य!’, ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी दिला इशारा
- पुन्हा एकदा हायव्होल्टेज ड्रामा होणार; ठाकरे सरकारविरोधात उद्या भाजपचे राज्यभर आंदोलन
- मोठी बातमी! करुणा शर्मा यांना दिलासा नाही; तुरुगांतील मुक्काम वाढला
- ‘माझ्यावर यशवंतराव चव्हाणांचे संस्कार’, दरेकरांच्या विधानावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया