शिवसेना मुखपत्र सामनातुन गेल्या काही दिवसात अनेक विषयांवर भाष्य करण्यात आले जसे कि राज्यातील वाढता कोरोना , भारत चीन संघर्ष, राज्यातील कुरघोडी यांसारख्या विषयांवर रोखठोक भाष्य करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत याना जोरदार टोलेबाजी केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी पुढील आठवड्यातील रोखठोकसाठी ट्विट करत काही प्रस्ताव सुचवले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी पारनेर ते कर्जमाफी या विषयांवर जवळपास आठ ट्विट करत चार प्रस्ताव सुचवले आहेत.
चंद्रकांत पाटील यांचे प्रस्ताव –
नंबर १ – “मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय १० आयपीएस अधिकाऱ्यांची बदली…… ठाकरे सरकारचा कारभार अतिशय पारदर्शी आहे…….तीन दिवसात बदलीचे आदेश रद्द……. मुख्यमंत्री कोण आहेत हे तर आम्ही दाखवून दिलं….हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपाची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे….”
नंबर १ – "मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय १० आयपीएस अधिकाऱ्यांची बदली…… ठाकरे सरकारचा कारभार अतिशय पारदर्शी आहे…….तीन दिवसात बदलीचे आदेश रद्द…….
मुख्यमंत्री कोण आहेत हे तर आम्ही दाखवून दिलं….हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपाची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे…."
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) July 8, 2020
नंबर २ – “पारनेर नगरपरिषदेत अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला……सर्वांना आपापला पक्ष वाढवण्याची इच्छा होतच असते………………पवार साहेब आणि ठाकरे साहेब दोन्हीही आपलेच आहेत……………… मात्र तरीही शिवसेना शांत बसणार नाही…………….. हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपाची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे…..”
……..पवार साहेब आणि ठाकरे साहेब दोन्हीही आपलेच आहेत……………… मात्र तरीही शिवसेना शांत बसणार नाही…………….. हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपाची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे….."
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) July 8, 2020
नंबर ३. “ठाकरे सरकार तर सर्वोत्तम आहे………….. यापूर्वी राज्याला असे प्रशासन कधीही लाभले नाही…………… मात्र कोरोनाचा मृत्युदर वाढत चालला आहे……….दिवसाला ६ हजार पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येत आहेत…………. हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपाची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे…”
….दिवसाला ६ हजार पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येत आहेत…………. हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपाची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे…"
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) July 8, 2020
नंबर ४. “राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्ज माफी केल्याचे ढोल बडवले…………. अजूनही अंमलबजावणी नाही…………… शेतकऱ्यांना वाईट दर्जाचे बियाणे दिले जात आहेत……………….खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अजूनही कर्ज देण्यात आलं नाही……………… हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपाची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे…..”
………..खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अजूनही कर्ज देण्यात आलं नाही……………… हे सर्व यासाठीच घडलं कारण भाजपाची राज्य सरकारला पाडण्याची इच्छा आहे….."
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) July 8, 2020
दरम्यान, सामनाचे संपादक संजय राऊत काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.