सातारा – राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार लवकरच पडेल, असे म्हटल्याबद्दल काही दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी टोमणा मारला होता. चंद्रकांत पाटील हे आता हस्तरेषा बघतात असे वाटते! चंद्रकांत पाटील यांनी आज पवारांना टोमणा मारला, हे सरकार पडणार आहे, असे म्हटले तर कोणाच्या पोटात का दुखते?
महाराष्ट्रावर कितीही संकटे आली तरी सरकार खंबीर; मुख्यमंत्र्यांनी जनतेला लिहलं खास पत्र
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव करून विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर ज्ञानदेव रांजणे यांच्या घरी आंबेघर(ता.जावळी) जाऊन पाटील यांनी आज सकाळी त्यांचे अभिनंदन केले
भाजपला केंद्रीय यंत्रणांचा वापर करूनही सरकार पाडता आलेलं नाही; नवाब मलिकांचा हल्लाबोल
यावेळी पत्रकारांशी बोलताना पाटलांना पवारांच्या विधानाबाबत विचारले असता पाटील म्हणालेत, माझ्या प्रत्येक म्हणण्याला आधार असतो. पण, मी यावर विश्वास ठेवणारा आहे की प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते, त्यावेळी ती होते. त्यामुळे, मी असे म्हणत राहणार आणि हे म्हणण्याचे स्वातंत्र्य मला आहे. ज्या दिवशी गणित जमत नाहीत त्या दिवशी माणसं बाहेर पडतात. प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते.
Read Also :
- हिवाळी अधिवेशनच्या तारखा निश्चित, लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवेश
- संसदेच्या अधिवेशनात गोंधळ: १२ खासदारांच निलबंन, शिवसेनेच्या दोन खासदारांचा समावेश
- अनुदान सहाय्यतेत मोदी सरकारची महाराष्ट्राला सावत्र आईसारखी वागणूक; सचिन सावंतांचा हल्लाबोल
- …आणि पंकजा ताईंना पान तयार करण्याचा मोह आवरता आला नाही!
- लेकाच्या लग्नात गुलाबराव पाटलांचा भन्नाट डान्स; डीजेच्या तालावर धरला जबरदस्त ठेका