मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्याने दोन्ही पक्षाची युती होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, राज ठाकरे यांनी आपण चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्याच नसल्याचा दावा केला. त्यानंतर, चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार, आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले आहेत.
हे पण वाचा: रिंगरोड बाधित शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही – चंद्रकांत पाटील
आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात चर्चा होणार असल्याचे समजते. मात्र, युतीचा कुठलाही प्रस्ताव नसून ही मैत्रीपूर्ण भेट आहे. भेटीत विचारांचे आदान-प्रदान होणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच ”युती झाली नाही तरी मैत्री राहील”, असं भेटीच्या आधी चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केलं आहे.
हे पण वाचा: बाणेर-बालेवाडी भागातील पहिल्या प्रथमोचार आरोग्य केंद्राचे लोकार्पण
माझ्या भूमिका स्पष्ट असतात, मी भूमिका बदलत नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं होत. त्यानंतर, पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या भाषणाची क्लीप मी ऐकली असून लवकरच राज यांची भेट घेणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होत. त्यानुसार, ही भेट होत आहे.
हे पण वाचा: “सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या थांबवा, कायद्याचे उल्लंघन करू नका” चंद्रकांतदादा पाटील
मला भाषणाची क्लीप मिळाली, ती त्यांच्या सहकाऱ्याने पाठवली की कुणी हे मलाही माहिती नाही. पण, भाषणाच्या क्लिपची आणि त्यांच्या भूमिकेची आम्ही नक्कीच चर्चा करू. मी ती क्लीप शांतपणे ऐकली, त्यामध्ये उत्तर भारतीय पुरोहितांनीही राज ठाकरे यांचा सत्कार केला आहे. ही क्लीप पाहिल्यानंतर त्यातील मुद्द्यावर चर्चा करायची आहे, असे पाटील यांनी म्हटलं होतं.
Read Also :
- पेगासस हेरगिरी प्रकरण: होत असलेले आरोप गंभीर, सत्य बाहेर यायला हवं – सर्वोच्च न्यायालय
- सेनेसाठी विदर्भात धोक्याची घंटा, वर्षभरात तिघांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
- केंद्र सरकार लोकशाहीचे चारही स्तंभ मोडीत काढायला निघाले; संजय राऊतांची घणाघाती टीका
- मुंबईच काय घेऊन बसलात, पूरस्थिती जगभर निर्माण होतेय, तेथे महापालिका आमच्या ताब्यात आहे का?
- “अमृता फडणवीस यांना काम नाही, भाजपने त्यांची पक्षाच्या प्रवक्तेपदी नेमणूक करावी” मनीषा कायंदे यांची खोचक टीका