कोल्हापूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विविध मुद्यांवरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. पेट्रोल डिझेलवरील कर कमी करणं. उद्धव ठाकरे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणं, नवाब मलिक यांच्यावर एनआयएच्या कारवाईची मागणी आदी मुद्यावर चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे.
चंद्रकात पाटील यांनी नवाब मलिक यांना राज्यातील कोणत्याही गावात फिरू देणार नाही, असं म्हटलंय.एनआयएनं नवाब मलिक यांना तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी केली पाहिजे.नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.
एसटी संप चिघळणार; गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा आझाद मैदानावर मुक्काम
पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यानंतर महागाई विरोधात काँग्रेस नेत्यांकडून आंदोलन करण्यात आलं होतं. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार यांच्या नेतृत्त्वातील सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे 5 आणि 10 रुपयांनी कमी केलं आहे. त्यानंतर 11 भाजपशासित राज्यांनीदेखील कर कमी केले आहेत. फक्त भाजपशासित राज्यांनीच नाही तर काँग्रेसशासित राज्यांनी देखील इंधनावरील कर कमी केले आहेत. मात्र, ठाकरे सरकारनं कर कमी करण्याचा निर्णय घेतला नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. उद्धव ठाकरे यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालय का चालत नाही, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. मुख्यमंत्री सरकारी रुग्णालयात उपचार घेत नाहीत याचा अर्थ राज्यातील सरकारी रुग्णालय सुस्थितीत नाहीत हे सिद्ध होतंय, असं चंद्रकात पाटील म्हणाले. मला वैयक्तिक टीका करायची नाही. पण, देवेंद्र फडणवीस यांना कोरोना झाल्यानंतर ते सरकारी रुग्णालयात दाखल झाले होते, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
Read Also :
- राजकारणाला बळी पडू नका, संप मागे घ्या, सगळ्यांचेच नुकसान होत आहे – अनिल परब
- एसटी महामंडळाचे विलीनीकरण शक्य नाही, असं सुधीर मुनगंटीवारांनीच सांगितलयं – संजय राऊत
- कुणीही आत्महत्येचं पाऊल उचलू नका, मी स्वत: यामध्ये लक्ष घालीन – राज ठाकरेंच आश्वासन
- देवेंद्र फडणवीस लेखी माफी मागा; नवाब मलिकांच्या लेकीने पाठवली अब्रूनुकसानीची नोटीस
- कोरोनाकाळात गायब असलेले नेते आता मात्र सक्रीय; निवडणुकांची चाहूल लागताच इच्छुकांच्या सोशल मीडियावर घिरट्या