मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केले असून, यावरून राज्यातला ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर नाराज आहे. यातच आता निवडणूक आयोगाकडून धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या ५ जिल्ह्यांतील ३३ पंचायत समित्या आणि ५ जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांवर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला गेला असून, त्यामुळे हा मुद्दा अजूनच चिघळला गेला आहे.
हे पण वाचा, “अनेकजण अनेक रंग दाखवत आहेत, पण तो बदलण्याचं धाडस या सरकारमध्ये आहे”
दरम्यान, यावरून एकीकडे विरोधी पक्ष आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी, विरोधी पक्षाने राज्य सरकारच्या निषेधार्थ, २६ जूनला राज्यव्यापी ‘चक्का जाम’ आंदोलनाची हाक दिली असून, आता ‘जेल भरो’ आंदोलनदेखील भाजपकडून केले जाणार आहे. तसेच, दुसरीकडे छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली देखील ओबीसी समाजाने ‘आक्रोश आंदोलन छेडले आहे.
हे पण वाचा, भाजपाला कधीपासून ओबीसींचा कळवळा? जेव्हा त्यांचे नेतृत्व संपवले तेव्हा हा कळवळा कुठे होता?
यातच आता, या मुद्द्यावरून छगन भुजबळ आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक टोलेबाजी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे, भुजबळांनी फडणवीसांना एक विनंती केली आहे. “फडणवीसांनी ओबीसी आरक्षणाचं पूर्ण श्रेय घ्यावं, पण आरक्षणाचा इम्पेरिकल डाटा केंद्राकडून मिळवण्यासाठी प्रयत्न करावे,” अशी विनंती त्यांनी केली आहे.
हे पण वाचा, कोरोनाची तिसरी लाट: घाई घाई ने निर्बंध शिथिल करू नका – उद्धव ठाकरे
तसेच, ५ वर्षांच्या युती सरकारच्या काळात हा विषय तुमच्या हातात होता, तेव्हा तुम्ही काही करू शकला नाहीत आणि आता तर तुम्ही म्हणताय, ४ महिन्यांत आरक्षण मिळवून देऊ. ठीके, आम्ही स्वत: फडणवीसांच्या नेतृत्वात कधीही पंतप्रधानांना, ओबीसी आरक्षणाच्या इम्पेरिकल डाटाच्या संदर्भात भेटायला तयार आहोत, मी स्वत: त्यांना हे नेतृत्व देईन, तुम्ही आंदोलन करत आहात, मी त्याचं स्वागत करतो,” असा टोलाही त्यांनी फडणवीसांना लगावला आहे.
Read Also :
- कोण होते दि. बा. पाटील? नवी मुंबई विमानतळाला त्यांचं नाव देण्याची मागणी का केली जातेय?
- पुण्यातील आंबील ओढ्यात घरे पाडण्याच्या कारवाईला अखेर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे कडून स्थगिती
- “या सरकाराला आव्हान, तुमच्यात दम नसेल; तर आम्हाला सांगा ४ महिन्यात आरक्षण देतो”
- “महाराष्ट्रात जे चाललंय त्याला सरकार म्हणता येईल का?”, फडणवीस ठाकरे सरकारवर गरजले
- आव्हाडांनी घेतली फडणवीसांची भेट! मुख्यमंत्र्यांना देखील नाही कल्पना