मुंबई : दिल्लीतील महाराष्ट्र सदनासाठी २००५ साली निविदा प्रक्रिया न राबवता डेव्हलपरची नेमणूक केल्याचा आरोप तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावर करण्यात आला होता. भुजबळ यांच्यासह इतरांनी कोट्यवधींचा गैरव्यवहार यामध्ये केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी पुढे पीएमएलए अंतर्गत ईडीने आणि एसीबीने मुंबई सत्र न्यायालयात आय़पीसी कलम ४०९ आणि कलम ४७१ अ अंतर्गत त्यांच्यावर कारवाई केली होती.
दरम्यान, याप्रकरणी आता एसीबी न्यायालयाने ५ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे खासदार समीर भुजबळ यांनीही न्यायालयात दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला आहे. यात त्यांनी आपल्यावर करण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याने, ते रद्द करण्यात यावेत, अशी मागणी मुंबई सत्र न्यायलयात केली आहे. आता याप्रकरणी पुढील काही दिवसात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
राज्यात तोंड उघडणारे दानवे-राणे, मराठा आरक्षणावर संसदेत तोंड का उघडत नाहीत? राऊतांचा संतप्त सवाल
सत्र न्यायालयाने ५ जणांची निर्दोष मुक्तता करताना, तपास अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. तसेच, गुन्ह्याची नोंद करताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणे आणि बेकायदेशीर कारवाई केली असल्याचेही निकालात म्हटलं आहे. सध्या या आर्थिक घोटाळ्या प्रकरणी भुजबळ यांच्यासोबत एकूण १४ जणांवर गुन्हा दाखल असून, डेव्हलपर चमणकर कुटुंबातील प्रविणा चमणकर, प्रणिता चमणकर, प्रसन्न चमणकर, कृष्णा चमणकर आणि अभियंता अरुण देवधर यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.
प्रदेश भाजपाच्या शिष्टमंडळाचा दिल्ली दौरा राज्याच्या विकासकामांसाठी, चंद्रकांत पाटील यांची माहिती
त्यामुळे, महाराष्ट्र सदन प्रकरणात घोटाळा झालेला आढळत नसल्याचे, विशेष एसीबी कोर्टाने नोंदविलेले मत, मंत्री छगन भुजबळ यांच्यासाठी दिलासा देणारे ठरु शकणार का? आणि या प्रकरणी तुरुंगात जाऊन आलेल्या भुजबळ यांची निर्दोष मुक्तता होणार का? याकडे सध्या लक्ष लागून आहे.
Read Also :
- मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी अटीही अश्या, की ज्यांची पूर्तता करायलाच येत आहेत नाकी नऊ
- आघाडी सरकार, तुमची इयत्ता काय? न्यायालयाने सीईटीवरून फाटकारल्यानंतर भाजपने लगावला टोला
- “आरक्षणावर बोलण्याची संधी दिली जावी,” छत्रपती संभाजीराजेंची उपराष्ट्रपतींकडे पत्राद्वारे मागणी
- “पक्षाला अध्यक्ष असेल तरच भाजपला पराभूत करता येईल,” काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने दिला पक्षालाच घरचा आहेर
- हर्षवर्धन आणि विखे पाटलांनी घेतली अमित शहांची भेट, राजकीय पुनर्वसनासाठी ‘गुफ्तगू’ केल्याच्या चर्चा