पुणे : राज्यातला महामारीचा प्रादुर्भाव सध्या कमी झाला असला, तरी हा फैलाव वाढत होता तेव्हा राज्यात ऑक्सिजन, औषधे आणि इतर आरोग्य सुविधांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत होता. दरम्यान, राज्य सरकराने योग्य ती पावले उचलत हा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजनांची अंमलबजावणी केली.
हे पण वाचा, सेनेकडून सत्तेसाठी हिंदुत्वास काळीमा फासण्याचे काम; प्रविण दरेकरांची टीका
यातच, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील पत्र लिहून राज्यभरातील साखर कारख्यान्यांना ऑक्सिजन निर्मिती पुढाकार घेण्याचे आवाहन केले. या आवाहनाला अनेक साखर कारखान्यांनी सकारत्मक प्रतिसाद दिला. याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य आत्मनिर्भर व्हावं, आपल्या पायावर उभं राहावं आणि राज्याला इतर राज्यांपुढे हात पसरवण्याची वेळ येऊ नये अशी मुख्यमंत्री आणि शरद पवारांची इच्छा आहे,’ असं वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे केलं आहे.
हे पण वाचा, कोल्हापूरात उद्या मुक मोर्चा, कोणलाही उलट-सुलट बोलू नका – संभाजीराजे
पुण्यातल्या वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटमध्ये शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीआधी राजेश टोपेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले. तसेच, यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या आणि सध्या राज्यात तापत असलेल्या अनेक मुद्द्यांवर देखील भाष्य केले असून, जोवर केंद्राच्या कायद्यात बदल होणार नाहीत, तोपर्यंत आरक्षणाचा कुठलाही प्रश्न मार्गी लागू शकत नाही’, असे सांगत त्यांनी, ‘मराठा समाजाला, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिले पाहिजे,’ असं मत व्यक्त केलं आहे.
Read Also :
- पाऊस हुलकावणी देतोय, शेतकऱ्यांनी लागवड करण्याची घाई करू नये – दादा भुसे
- सरकार आमच्या भरोश्यावर; आम्ही सरकारच्या नाही; नाना पटोलेंचे ट्टिट
- ‘त्या’ १२ जणांच्या यादीच्या उपलब्धतेबाबत आज राजभवनात सुनावणी होणार
- ‘काँग्रेस हाच भाजपाला पर्याय, गावखेड्यात पक्षाचा विचार पोहचवा’; पटोलेंचा कार्यकर्त्यांना आदेश
- ‘दोन्ही राजे एकत्र आल्याचे स्वागत, पण त्यांचं बोलणं भाजपच्या मिठाला जागल्यासारखं’