छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर सध्या हे शहर चर्चेत आलं आहे. आज रात्री छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात राडा झाल्याची घटना घडली आहे. यावेळी अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली असून दगडफेक झाल्याचीही माहिती आहे. या घटनेनंतर राज्यात सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आला असून ४०० ते ५०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे.
हेही वाचा… पुण्याच्या आघाडीच्या तीन आमदारांनी घेतली उच्च न्यायालयात धाव, शिंदे-फडणवीसांच्या विरोधात याचिका दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरमधली परिस्थिती नियंत्रणात आहे. आपण सगळ्यांनी शांतता राखली पाहिजे. रामनवमीचा उत्सव आहे. आपल्या राज्यात सर्वधर्मीय सर्व जण एकत्र येऊन साजरे करतात. त्यामुळे सर्वधर्मीयांना माझी विनंती आणि आवाहन आहे की, इतके वर्ष आपण सण आंनदाने साजरे करतो. आत्ताही शांतता राखा आणि उत्सव साजरे करा. राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहिल यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं.
हेही वाचा…पुण्याचा नवा खासदार कोण ? भाजपमध्ये अनेकांची नावं चर्चेत, पोटनिवडणुक बिनविरोध की थेट लढत ?
तसेच या राड्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीनगरमध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे. काही लोकांकडून भडकाऊ भाषण देऊन परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा परिस्थितीत काय बोलावं, याचं भान प्रत्येकाने ठेवायला हवं.सर्वांनी शांतता राखायला हवी. आपलं शहर शांत ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. या घटनेला कोणी राजकीय रंग देत असतील तर यापेक्षा जास्त दुर्दैवी काहीही नाही.
Read also
हेही वाचा…“धनुष्यबाण गेला तरी प्रभू श्रीराम माझ्यासोबतच”, उद्धव ठाकरे
हेही वाचा…“धनुष्यबाण गेला तरी प्रभू श्रीराम माझ्यासोबतच”, उद्धव ठाकरे
हेही वाचा…“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादीची प्राथमिकता महाविकास आघाडीला”, जयंत पाटील
हेही वाचा…“महाराष्ट्र सरकार नपुंसक,” न्यायालयाची टिप्पणी, अजित पवार सरकारवर भडकले, म्हणाले, “आत्मपरिक्षण करा…”
हेही वाचा…हिंदू शेरनी..! भगवं उपरणं, काळा ड्रेस, अन् बुलेटवर स्वारी, नवनीत राणांचा हटके व्हिडीओ