मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदासाठी शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या समर्थंनाकडून जल्लोष साजरा केला जात आहे.
15 तासानंतर राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंबाबत ट्विट; म्हणाले की,”एखादा माणूस ज्यादिवशी..”;
एकनाथ शिंदे यांनी केलेलं शिवसेनेतील बंड हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं बंड होतं. त्यानंतर जवळपास 9 दिवस राज्यात मोठ्या राजकीय वादळी घटना घडल्या. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपला सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला. नव्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीसचं मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चेंना फटकारत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा करून सगळ्यानांच धक्कातंत्र दिलं. त्याचबरोबर मंत्रिमंडळात आपण राहणार नसल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात एक नवी राजकीय खेळी खेळल्याचं बोलण्यात येत आहे.
फडणवीस मंत्रीमंडळ : राहुल कुल की महेश लांडगे.. कुणाला मिळणार संधी?
महाविकास आघाडी सरकारने गेल्या अडीच वर्षात कोणतीही विकासाची कामे केली नाहीत. राज्याच्या इतिहासात दोन मंत्री भ्रष्टाचारामुळे तुरूंगात आहेत. ही आश्चर्याची आणि खेदजनक बाब होती. एकीकडे बाळासाहेबांनी देशाचा शत्रू असलेल्या दाऊदचा विरोध केला. तर दुसरीकडे त्याच्याशी संबंधित मंत्री तुरूंगात जातो त्याला मंत्रीपदावरून काढलं नाही. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Read also
- बारामतीच्या दादाची जागा कोथरूडचा दादा घेणार; अन् फडणवीस महाराष्ट्र पालथा घालणार
- बारामतीच्या दादाची जागा कोथरूडचा दादा घेणार; अन् फडणवीस महाराष्ट्र पालथा घालणार
- महाराष्ट्राला पुन्हा एकदा सेनेचा मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय
- एकनाथ शिंदे मुंबईत दाखल होताच, म्हणाले, “मीच शिवसेनेचा गटनेता”
- मोठी बातमी : नवीन सरकारचा आज सायंकाळी ७ वाजता शपथविधी