नाशिक : राज्यात मराठा आरक्षणानंतर सध्या, ओबीसींचा, स्थानिक स्वराज्य संस्थेततील राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण तापले आहे. भाजपने यावरून सत्तेतील महाविकास आघाडीला धारेवर धरलं असून, महाविकास आघाडीकडूनही भाजप, ‘ओबीसी विरोधी पक्ष’ कसा आहे, हे दाखवण्याचे जोरदार प्रयत्न केले जात आहेत.
धक्कादायक! मोदी सरकारचा देशाच्या सुरक्षेशी खेळ? विरोधकांनी केला हेरगिरीचा भांडाफोड
यातच आज पुन्हा एकदा, भाजप सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिक मध्ये पत्रकार परिषदेत बोलताना, “भाजप हा ओबीसींचा पक्ष आहे,” असा पुनरुच्चार केला. तसेच, “ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर विजय वडेट्टीवार बोलतात, छगन भुजबळ मोर्चे काढतात मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एक शब्द बोलत नाहीत. त्यामुळे, यातील कोणीतरी झारीतील शुक्राचार्य आहे,” असा हल्लाबोल त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.
तसेच, “भुजबळांनी पुढाकार घेऊन यात लक्ष घालावे. डेटात ६९ लाख चुका आहेत. त्यामुळे तो नव्याने तयार करावा लागणार आहे. मात्र, त्यासाठी या सरकारची इच्छाशक्ती दिसत नसून, महाविकास आघडीतील हे मोठे मंत्रीच झारीतील शुक्राचार्य आहेत. त्यांना डिसेंबर २०२२ पर्यंत ओबीसींना त्यांच्या हक्काचं आरक्षण द्यायचं नाहीये,” असा घणाघात करत, “राज्यात आणि देशात ओबीसी नेत्यांना सगळ्यात जास्त प्रतिनिधित्व भाजपानं दिलं आहे,” असा दावा त्यांनी केला.
भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केले देवेंद्र फडणवीसांना नव्या पुण्याचे शिल्पकार
दरम्यान, भाजपकडून राज्यात, ओबीसी जागर अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमावेळी राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी, “सरकारच्या वेळकाढूपणामुळे ओबीसी आरक्षण गेलं, हे आरक्षण संपवण्याचं काम या सरकारनं केलं आहे,” असा आरोप ठाकरे सरकारवर केला आहे. तसेच, “रोज खोटं बोल पण रेटून बोल, असं या सरकारमधे सुरु असून, इथे नेते कमी आणि बोलके पोपट जास्त बोलतात,” अशी बोचरी टीका त्यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.
Read Also :
- मनसेने महापालिकेला घोषीत केले ‘कैलासवासी पुणे महानगरपालिका’ ; सत्ताधाऱ्यांच्या ढिसाळ कारभारावर निशाना
- आषाढीदिनी पंतप्रधान मोदींची विठ्ठल चरणी प्रार्थना; म्हणाले वारकरी चळवळ ही…
- राज्यसभेच्या १४ जागा रिक्त, पोटनिवडणूक एकाच जागेवर, राजकीय पक्षांना धक्का
- रणधुमाळी महापालिका निवडणुकांची : पुण्याची काँग्रेसची धूरा पृथ्वीराज चव्हाणांकडे?
- “काँग्रेसनेही कायम केला आहे यंत्रणाचा यथेच्छ गैरवापर”, भाजपने आकडेवारी देत केला गंभीर आरोप