ठाणे : राज्यात सध्या राजकीय नेते सभांमधून एकमेकांवर चिखलफेक करण्यात दंग आहेत. मनसे अध्य़क्ष राज ठाकरे यांच्या सभेनंतर देवेंद्र फडणवीस यांची देखील अलिकडेच सभा पार पडली. त्यामधून त्यांनी सत्ताधारी पक्षांवर त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे. अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याची आज सभा होत आहे. त्यावरून आता मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिप्पणी केली आहे.
अखेर राज ठाकरेंच्या सुरक्षितेत वाढ; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज टोमणे सभा होत आहे. वाघनखं, मर्द, मावळा, कावळा यांचा उल्लेख ते निश्चितच करणार आहे. मात्र त्याव्यतिरिक्त त्यांनी आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पुर्ण करावे. मशिदीवरील भोंगे आणि रस्त्यावरील नमाज अशी घोषणा बंद करूच अशी घोषणा आज करूनच टाका आणि या राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेसची बंधनं झूकारून टाका. असं मनसे नेते गजानन काळे यांनी म्हटलं आहे.
फक्त तुमच्या ह्यदयात राम न ठेवता. तो कृतीत सुद्धा येऊ द्या आणि खऱ्या हिंदुत्वाचा मुद्दा संपुर्ण महाराष्ट्राला कळू द्या. असं मनसे नेते गजानन काळे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेकडे आता सगळ्यांचचं लक्ष लागून आहे. अशातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी करारा जवाब मिलेगा असं म्हणत विरोधकांना कडक शब्दात इशाराही दिला आहे.
फक्त पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा…याला औरंगजेबाकडे..; नितेश राणेंचा ओवेसीला सज्जड दम
दरम्यान, गेल्या काही दिवसापासुन राज्यात हिंदुत्वाचा मुद्दा जोर धरू लागला आहे. त्यातच मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसा हे विषय पुढे येत आहेत. त्यावरून राज्यातील राजकीय नेत्यांना चांगलीचं खडाजंगी बघायला मिळाली आहे. मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे यांची मोठी राजकीय सभाच झाली नाही. गुढीपाडव्याला होणारी सभा देखील कोरोनामुळे पार पडली नाही. त्यामुळे या सभेत उद्धव ठाकरे या विषयांवरून विरोधकांना खडेबोल सुनावणार का ? ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विरोधकांना करारा जवाब देणार का?
- “विश्वातघात तर नाना पटोलेंनी केला”; नाना पटोलेंच्या आरोपांवर राष्ट्रवादीकडून खंडन
- केतकीबाईला लवकरच जंगी चोपाची गरज; रूपाली पाटलांचा केतकीला इशारा
- केतकी चितळेचं डोकं फिरलं..! पवारांना उद्देशून म्हणाली की, “ऐँशी झाले आता उरक, वाट पहातो नरक”;
- “देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचे सारथ्य करावे”