सध्या राज्य सरकारबद्दल ज्यावेळी चर्चा होते. त्यावेळी नेहमी या सरकारचं स्टेअरिंग कोणाच्या हाती आहे, याबाबत सर्वाधिक चर्चा रंगलेल्या दिसतात यावर सार्वजनिक बांधाकम मंत्री अशोक चव्हाण यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे.
सध्या राज्यात तीन पक्षांच सरकार असलं तरी राज्य सरकारचं स्टेअरिंग हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात असल्याचं सार्वजनिक बांधाकम मंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
अशोक चव्हाण म्हणाले, सरकार जरी तीन पक्षाचे असले तरी ड्रायव्हिंग सीटवर मुख्यमंत्री आहे. सरकार चालवण्याचे काम ते करतात. आम्ही आमची मत त्यांच्यासमोर मांडतो परंतु अंतिम निर्णय हा मुख्यमंत्र्यांचा असतो. तो आम्हाला मान्य आहे
महाविकास आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेस पक्षाकडे दुर्लक्ष होते. यावर चव्हाण म्हणाले, तीन पक्षाचे सरकार असल्याने काही मर्यादा येतात. तीन्ही पक्षांनी समजून घेणे गरजेचे आहे. अडचणी वाटल्यास आम्ही त्याबद्दल व्यक्त होतो. त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर मार्ग निघतो. तीन पक्षांच सरकार असल्याने काही उणीवा असण्याची शक्यता आहे. त्या उणीवा दूर करण्याचा प्रयत्न आहे.