सध्या राज्यात कोरोनाग्रस्तांची आकडेवारी वाढत आहे. राज्य सरकारला अनेक आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या राज्य मंत्रीमंडळाने बैठकीत या संकटाच्या काळात काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. बैठकीमध्ये शिवभोजन थाळी, रेशन कार्ड, पेयजल योजना आणि इतर विभागातील काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
राज्य मंत्रीमंडळाने घेतलेले महत्त्वाचे निर्णय –
- मुंबई उपनगरातील जुहू बिचवरील खाद्यपेये विक्रेते को.ऑप.सोसायटी ली. यांना भाडेपट्टयाने मंजूर केलेल्या जमिनीच्या भुईभाडयाच्या दराबाबत निर्णय घेण्यात आला.
- अतिरिक्त दुधाचे भुकटीत रुपांतर करणाऱ्या योजनेस ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
- महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियमात सुधारणा केली जाणार आहे.
- जल जीवन मिशन राबविण्यास मान्यता.
- शिवभोजन थाळीचा दर पुढील ३ महिन्यांसाठी पाच रुपये राहणार आहे.
- केशरी शिधापत्रिकाधारकांना ऑगस्टपर्यंत सवलतीत अन्नधान्य मिळेल.
- कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे ” आता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग,” असे नामकरण करण्यात आले आहे.
- आयडीबीआय, प्रादेशिक ग्रामीण बँक आणि १५ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांना शासकीय बँकींग व्यवहारास मान्यता.
- मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम योजनेस मुदतवाढ देण्यात आली आहे.