मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोमवारी (19 ऑक्टोबर) सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी ते सांगवी, अक्कलकोट येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. सकाळी 8 वाजता मातोश्री निवासस्थानावरुन ते सोलापूरसाठी रवाना झाले होते.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. तसेच तेथील ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा जोरदार पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रत्यक्ष पूरपरिस्थितीची पाहणी करून शेतकरी, ग्रामस्थांना दिलासा देणारआहेत. त्यानंतर दुपारी तीन वाजता आढावा बैठक घेणार आहेत. नुकसानग्रस्त भागासाठी मुख्यमंत्री काही महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या पाहणी दौऱ्याकडे शेतकऱ्यांसह सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
उद्धव ठाकरे हे आज सकाळी 9 वाजता सोलापूर विमानतळावर पोहचले असून . त्यानंतर सकाळी 10.15 वाजता उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील काटगाव आणि अपसिंगा येथे अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी करतील. तसेच शेती पिकांच्या नुकसानीची ते पाहणी करतील. त्यानंतर तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पूरपरिस्थितीबाबत लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्याशी चर्चा करतील. त्यानंतर दुपारी 1.45 वाजता मुंबईकडे जाण्यासाठी ते सोलापूरच्या दिशेने रवाना होतील. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत महसूल मंत्री बाळासाहेब थोरातही सोलापूर जिल्हा पीक नुकसान पाहणी दौऱ्यावर आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूर दौऱ्यानंतर बुधवारी (21ऑक्टोबर) उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्ष विभागाने मुख्यमंत्री हे बुधवारी उस्मानाबाद जिल्हा दौरा करणार असल्याची माहिती दिली.
Read Also :
नुकसान भरपाई घरातून देता येत नाही त्यासाठी शेतकऱ्यांच्या बांदावर जावं लागतं…https://t.co/fWsK7qBfVL
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 18, 2020