हिंगोली : दरवर्षी १२ जून रोजी जागतिक बालकामगार विरोधी दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं १९ वर्षापूर्वी पुढाकार घेतला. १४ वर्षाच्या आतील बालमजूरी संपवणे आणि त्या मुलांना त्यांच्या शिक्षणाचा हक्क मिळवून देणे हा या दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. त्यामुळे, बालपण शिकण्यासाठी आहे, मजुरी करण्यासाठी नाही. आज जागतिक बालकामगार विरोध दिवस यानिमित्ताने बालकांना त्यांचे न्याय्य हक्क देण्यासाठी बालमजूरी संपुष्टात आणूया, असा संकल्प वसमत विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांनी केला आहे.
बालकांना त्यांचे बालपण मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक संघटना कार्यरत आहेत. आजही जगभरात, विशेषकरुन भारतासारख्या विकसनशील देश आणि इतर मागासलेल्या देशात बालमजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या देशांत बालकामगार विरोधी कायदे झाले असले तरी बालमजुरांच्या संख्येत म्हणावी तितकी घट झाली नाही. त्यावर जगभरात जागरुकता निर्माण करण्यासाठी १२ जून रोजी जागतिक बालकामगार विरोधी दिवस साजरा करण्यात येतो.
बालपण शिकण्यासाठी आहे,मजुरी करण्यासाठी नाही.आज जागतिक बालकामगार विरोध दिवस यानिमित्ताने बालकांना त्यांचे न्याय्य हक्क देण्यासाठी बालमजूरी संपुष्टात आणण्याचा संकल्प करूया.#WorldDayAgainstChildLabour #जागतिक_बालकामगार_विरोध_दिवस #rajunavgharencp #vasmat pic.twitter.com/IAEZIiOcxL
— Raju Navghare (@RajuNavghareNCP) June 12, 2021
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या वतीनं २००२ सालापासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. या दिवशी जगभरातील शासकीय संस्था, अशासकीय सामाजिक संस्था, कामगार संघटना, नागरी समाज संस्थांच्या माध्यमातून बालमजुरांची संख्या कमी करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन केलं जातं. जगभरातील बालमजुरांच्या स्थितीवर प्रकाश टाकला जातो. जगभरात अनेक लहान मुलं अशी आहेत ज्यांना आपल्या बालपणाचा आनंद घेता येत नाही, त्यांना त्यांच्या शिक्षणाचा आणि आरोग्याचा अधिकार मिळत नाही, त्यापासून त्यांना वंचित रहावं लागतंय. त्यामुळे हे कुठेतरी थांबले पाहिजे. बालपण शिकण्यासाठी आहे, मजुरी करण्यासाठी नाही. त्यामुळे लहान मुलांना त्यांच्या हक्काचे जिवन मिळायला हवे, असे आमदार नवघरे यांनी सांगितले.
Read Also :
- मंत्र्यांचे आजोबा-पणजोबाही वारीला जातात, सरकारने विचार करूनच निर्णय घेतलायं – भुजबळ
- चिंतन, आढावा, बैठक नाहीच; नानांची वारी नेत्यांच्या घरी
- उच्च न्यायालयाने दिले आदेश, खासदार नवनीत राणांवर होणार मोठी कारवाई
- यंदाच्या आषाढी वारीचा वाद, तुषार भोसले भिडले थेट अजितदादांना म्हणाले…
- नागपूर राष्ट्रवादीत असंतोष: दुनेश्वर पेठेंच्या नियुक्ती नंतर पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर