मुंबई : दिल्लीतील निर्भया सारखीच संतापजनक आणि लाजिरवाणी अशी घटना मुंबईतील साकीनाका मध्ये घडली आहे. अमानुष अत्याचाराला सामोरे जावं लागलेल्या पीडितेवर, घटनेनंतर तीन दिवस मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात पीडितेवर उपचार सुरू होते. अतिरक्तस्त्रावामुळे तिची प्रकृती अतिशय चिंताजनक होती. मात्र आज अखेर मृत्यूशी सुरु असलेली तिची झुंज अपयशी ठरली असून तिचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेनंतर रुग्णालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
साकीनाका पिडीतेची मृत्युशी झुंज अपयशी ठरली
माफ कर ताई आम्हाला कुठल्या वेदनेतून गेली असशील याची कल्पनाही करवत नाही
पण
या मुर्दाड सरकार व व्यवस्थेला याचं घेणंदेणं नाही त्यांच्यासाठी तूझा मृत्यू म्हणजे फक्त अजून १ नंबर
लाज वाटते सावित्रीच्या लेकी म्हणवून घेतांना
नाही वाचवू शकलो तुला— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 11, 2021
दरम्यान, या घटनेनंतर विरोधक आक्रमक झाले असून, भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. ‘राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर या घटनेवरून राजकारण करू नका! असं म्हणतात. दिल्लीत जे झालं ते पहा! वर्ध्याच्या प्रकाराविषयी बोलावं, असं सांगतात. मला त्यांची अक्षरशः लाज वाटते. राजकारण करू नका! याला तुम्ही राजकारण म्हणत असाल, तर ते आम्ही ते करत राहू,’ असा हल्लाबोल त्यांनी केला.
अमरावतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
पीडित मुलगी ७महिन्यांची गर्भवती
भीतीपोटी पीडितेने गळफास लावून संपवली जीवनयात्रानिशब्द आहे मी
अत्याचाराच्या घटना संपतचं नाहीयेत
रोजचं सुरूहे अमरावतीच्या मुलीने जीवन संपवलं तर मुंबईतील महिला मृत्युशी लढतीयेसावित्रीच्या लेकींची फरफट कुठपर्यंत
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 11, 2021
‘राज्यात महिला राज्यात सुरक्षित नाहीत. त्यावर आम्ही आवाज उठवला तर तुम्ही राजकारण करतो म्हणता? तुम्ही शक्ती कायद्याचं काय केलं? अट्रोसिटीचं काय केलं? ते आधी सांगा! त्या राजकारण करतात. सरकारची अपेक्षा काय आहे? थोड्या तरी लाजा वाटू द्या. तुमच्या जाहिरनाम्यात पहिला मुद्दा होता महिलांची सुरक्षा, कुठे आहे शक्ती कायदा?” असा सवाल विचारत “हे सरकार आधीपासून बलात्काऱ्यांना राजाश्रय देत आहे. त्यामुळे, विकृतांचं मनोबल वाढत आहे,” असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला.
‘महाराष्ट्रातल्या महिलांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका!’ चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया
‘सरकार म्हणून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे इतके धिंडवडे आजपर्यंत निघाले नव्हते. आज शिवाजी महाराज असते, तर या सगळ्यानं ढकलून दिलं असतं. आज तिची आई, तिची मुलं शेजारी बसून आहेत. त्यांचा काय दोष होता? तिला काय वेदना झाल्या असतील? काय सहन केलं असेल तिने? आम्ही भाषणापलीकडे काही करू शकत नाही. किती टाहो फोडायचा? आमचे अश्रू दिसत नाहीत? मला लाज वाटतेय”, अशी प्रतिक्रया देताना त्यांना गहिवरून आलं.
Read Also :
- मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा – नवाब मलिक
- आतडे कापले, प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला; मुंबईच्या साकीनाक्यातील बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी
- आमदार समाधान दादा, आम्ही खड्डयात चाललोय, आमची पिडा दुर करा: शालेय मुलीचं आवताडेंना पत्र
- महाविकास आघाडी सरकार स्थिर की अस्थिर? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
- धनंजय मुंडे, करुणा शर्मांचे फोटो टाकून FB वर बदनामीकारक पोस्ट; फडणवीस, पवारांबद्दल अश्लिल ‘मजकूर’