शिवसेनेचे नेते आणि सामानाचे संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली या मुलाखतीत संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना ऑपरेशन लोटस महाराष्ट्रात होईल का? असा प्रश्न विचारला त्यावर उद्धव ठाकरे यांनी बेधडक उत्तर दिले
राज्यात ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सरकार पाडणार असं काही जण सांगतात, मग वाट कसली बघताय, आता पाडा, मुलाखात चालू असताना सरकार पाडा, काही जणांना घडवण्यात आनंद असतो तर काही जणांना बिघडवण्यात आनंद मिळतो, बिघडवायचं असेल तर बिघडवा, मला पर्वा नाही, सरकार पाडा असं खुलं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिलं आहे.
तसेच महाराष्ट्रात फोडाफोडी करुन बघा असं त्यांनी सांगितले. त्याचसोबतच असा कोणताही विरोधी पक्षांतला नेता दाखवा, जो दुसऱ्या पक्षात जाऊन सर्वोच्च पदावर गेलाय, मुख्यमंत्री झालाय, तुम्हाला तुमच्या पक्षात काय मिळत नाहीय की, तुम्ही दुसऱ्या पक्षात जाताय. कित्येक अशी उदाहरण आहेत अशी फोडाफोडी होते त्यामागे वापरा आणि फेकून द्या ही नीती सर्वांनी अवलंबली आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांनाही टोला लगावला. ते म्हणाले,” दुसऱ्या पक्षाने केवळ वापरा आणि फेकून द्या करण्यासाठी आपला वापर करु द्यायचा की, आपण आपल्या पक्षात ठामपणाने काम करत राहायचं हे प्रत्येकाने ठरवावं. कदाचित एखादी व्यक्ती किंवा नेता आपल्या पक्षात आपल्यावर अन्याय करु शकत असेल किंवा करत असेल पण तुम्ही त्या पक्षाचा त्याग करुन दुसऱ्याची पालखी वाहणे हे करायचं. शेवटी पालखीच वाहणार ना की पालखीत बसणार आहात मिरवायला? त्यासोबतच पालखीत तुम्हाला बसवायला कोणी तयार आहेत का? असतील तर अवश्य जा, मी कुणाच्याही उज्ज्वल भवितव्याच्या आड येऊ शकत नाही. येत नाही. जर तुम्हाला दुसऱ्या पक्षात पालखीत बसण्याचं स्थान मिळत असेल, जरुर पालखीत बसा, पण पालखीचे भोई होण्यासाठी जाऊ नका.” असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुदा काही महिन्यांपूर्वी राष्टवादीसोबत बंडखोरी करून भाजपला हातमिळवणी करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोलाचा सल्ला दिला आहे.