मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असलायची माहिती मिळत असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आपली नाराजी काँग्रेस नेत्यांकडे, खासगीमध्ये व्यक्त केली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी होत असल्याची चिन्हे आता दिसून येत आहेत.
हे पण वाचा, पवारांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद, नव्या पर्यायाची भूमिका करणार जाहीर?
काही दिवसांपासून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून सातत्याने, राज्यात काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढणार असल्याचं जाहीर केलं जात होतं. याला भाई जगतापांनी, पृथ्वीराज चव्हाणांनी, तसेच सुशीलकुमार शिंदेनी देखील दुजोरा दिला. त्यामुळे निवडणुकीला अडीच वर्षे बाकी असताना, पटोलेंनी ही भूमिका घेतल्याने आणि विरोधी पक्षाला हातात ऐते कोलीत दिल्याने, यावरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी खासगीत नाराजी व्यक्त केली आहे.
हे पण वाचा, उच्च न्यायालायने पोलीस आयुक्तांना दिले, संजय राऊत यांच्या चौकशीचे आदेश
दरम्यान, नाना पटोले यांनी आपल्या या स्वबळावर लढण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं असून, “स्वबळाचा नारा फक्त आम्ही नाही, शिवसेनेनंही दिला आहे. पण राज्यात फक्त काँग्रेसलाच टार्गेट करण्याचं राजकारण सुरु आहे. मी कधीही सामना वाचला नाही. पण, आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा असेल, तर इतर कुणाला त्रास का व्हावा? आमच्यावर यावरून टीका होत असेल, तर आम्ही त्याला महत्व देत नाही. जयंत पाटील यांना आम्ही शुभेच्छा देतो की, त्यांनी शिवसेनेसोबत युती जाहीर करुन टाकावी,” अशा शब्दांत त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला उत्तर दिलं आहे.
हे पण वाचा, महाविकास आघाडी सरकार कडून पावसाळी अधिवेशन केवळ दोन दिवसांचं! भाजपकडून जोरदार टीका
त्यामुळे, काँग्रेसची ही भाषा सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्नच असल्याची भावना शिवसेनेसोबतच, राष्ट्रवादीमध्ये देखील निर्माण झाली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी पटोलेंच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जात आहे.
Read Also :
- विजय शिवतारे यांना ह्रदयविकाराचा झटका; भावांमुळे वडिलांची ही अवस्था झाल्याचा मुलीचा आरोप
- खासदार नवनीत राणांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून निर्णयाला स्थगिती
- हे जेनतेच्या हिताच सरकार आहे की तमाशा आहे? – देवेंद्र फडणवीस
- “राष्ट्रमंच’ हा केवळ बातमीत राहण्यापुरता केलेला केविलवाणा आणि नवा हास्यास्पद प्रयोग”
- महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे का? पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…