मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, स्वबळाचा नारा दिल्यापासून महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरु असलेली अंतर्गत धुसफूस सातत्याने बाहेर येत आहे. या स्वबळाच्या नाऱ्याचा धसका सत्तेतील इतर मित्रपक्षांनीही घेतला असून, आता यावर मुख्यमंत्र्यांनीही भाष्य केले आहे.
आज मुंबईत ‘डॉ. शंकरराव चव्हाण जलभूषण पुरस्कार’ सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अशोक चव्हाण, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील उपस्थितीत होते. यावेळी, अजित पवार यांनी, “मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्वांना एकत्र जेवणं दिलं, मग मी दिलं पण, आता अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्या निमंत्रणाची वाट बघतोय” असं विचारताच, चव्हाण यांनी, “सध्या महामारी आहे”, असं म्हटलं.
सूत्र : प्रशांत किशोर यांचं वक्तव्य, शरद पवार हे विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार!
दरम्यान, यावर मुख्यमंत्र्यांनी “आता जेवणाचा विषय निघाला चांगलं झालं, महामारीची भीती बाळगू नका, बाळासाहेब, आम्हीही स्वबळावर येऊ, स्वबळावर म्हणजे चालत येऊ”, असं म्हणत काँग्रेसच्या स्वबळाच्या भूमिकेवर टिपण्णी करत, टोला लगावला आहे. दुसरीकडे, पटोलेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेस नेत्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे, अशी माहिती आहे.
Read Also :
- कुणाच्याही नेतृत्वात लढा, भाजप ४०० पेक्षा अधिक जागा जिंकणारच – चंद्रकांत पाटील
- “महाराष्ट्र हे काँग्रेसचंच राज्य आहे, २०२४ मध्ये काँग्रेसच नंबर एकची पार्टी”
- मोठी बातमी : राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश?
- “३० वर्षे शिवसेनेत काम, पण सन्मान नाही; शिवसेना आमदाराची खंत”
- “निवडणुका एकटेच लढणार आहात का? निर्णय झाला असेल तर स्पष्ट सांगा”