मुंबई : महामारीच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबद्दल देशाच्या टास्क फोर्सने इशारा दिल्यांनतर, राज्याच्याही टास्क फोर्सने पावले उचलायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आज, तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत राज्याच्या कृतीदलाने आयोजित केलेल्या “माझा डॉक्टर” या ऑनलाईन परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी आंदोलन, तसेच यात्रेवरून राज ठाकरेंसह भाजपलाही फटकारले.
“आम्ही शेतकऱ्यांवर पीक फेकून द्यायची वेळ आणली नाही”, पवारांचा घणाघात
“मला आश्चर्य वाटतं. आपण सगळी काळजी घेत असताना, अनेकांना अनेक गोष्टी उघडण्याची घाई झाली आहे. हे उघडा, ते उघडा, अमूक उघडा, तमूक उघडा, असं ते म्हणत आहेत. जरा धीर धरा, राजकारण आपलं होतं, पण जीव जनतेचा जातो,” असं म्हणत राजकीय पक्षांना फटकारले, तर “आपण गोष्टी उघडत आहोत, तेव्हा त्या बंद करण्याची वेळ येऊ नये, याचीही खात्री करून पुढे जात आहोत. घाई-गर्दी केली, तर आणखी काही महिने, काही वर्षे या संकटातून आपण बाहेरच पडू शकणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
पवारांनी खंजीर खुपसल्याचा एक दाखला द्या, मी राजकारण सोडतो!
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 5, 2021
“तिसरी लाट येऊच नये यासाठी आपले प्रयत्न असायला हवेत. दुर्देवाने ती आली तर, घातकता कमी असावी या दृष्टीने आमच्या उपाययोजना सुरू आहेत. आजची स्थिती नियंत्रणात असली, तरी दुसरी लाट पूर्णपणे ओसरलेली नाही आणि तिसऱ्या लाटेचा धोका आहेच. त्यामुळे, ऑक्सिजन, रुग्णशय्या, औषधे, व्हेंटिलेटर्स यात आपण कुठेही कमी नाही ना, याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. तसेच, इतरही आजारांच्या रुग्णांची या काळात काळजी घेणे गरजेचे आहे,” असं ते म्हणाले.
ग्रामीण भागातील जमिनी हडपण्यासाठी २३ गावे समावेशाचा निर्णय; चंद्रकांत पाटील यांचा घणाघात
“राज्यात भाजपकडून अनेक ठिकाणी ‘घंटानाद’ आणि ‘शंखानाद’ आंदोलन मंदिरं उघडण्यासाठी केली गेली, तर मनसेकडून सण-उत्सवावरल लावलेली बंदी उठवण्यासाठी निदर्शने करण्यात आली. त्यावर, “आंदोलन करायचे तर महामारी विरुद्ध करा,” असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच, “गेल्या वर्षी याच काळात रुग्णांची संख्या वाढली होती. त्यामुळे आता या काळात आपण गाफील राहून चालणार नाही. त्यामुळे, लसीकरण झालं असलं, तरी मास्कचा वापर करा”, असं आवाहन त्यांनी जनतेला केलं.
Read Also :
- “निवडणुकांशिवाय महापालिका ताब्यात ठेवायचा सरकारचा कट”, राज ठाकरेंचा गंभीर आरोप
- ‘…तसं वाटत असेल तर मला आताच अटक करावी’, संजय राऊतांचे चंद्रकांत पाटलांना आव्हान
- ‘करेक्ट कार्यक्रमा’च्या इशाऱ्यांनंतर, शेट्टींच्या आमदारकी बाबत पवारांनी केला मोठा खुलासा
- “आघाडीसोबत गेले आणि ‘काशी’ झाली, आता परत काढा आत्मक्लेश यात्रा”, खोतांचा शेट्टींना टोला
- “पक्षात महिलांना डावललं जातं”, या मंदा म्हात्रेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटील म्हणतात…