शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक यांनी घेतलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसिद्ध झाला आहे. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे विविध मुद्यांवर भाष्य केले आहे. तसेच विरोधकांच्या टीकेला देखील उत्तर दिले आहे. विरोधकांकडून हे तीनचाकी सरकार आहे, अशी टीका वारंवार केली जाती. या प्रश्नाला उत्तर देताना राज्यात तीन चाकी सरकार असलं तरी या सरकारचे स्टिअरिंग माझ्याच हातात आहे, असे उत्तर उद्धव ठाकरेंनी दिले आहे.
संजय राऊत यांनी हे तीनचाकी सरकार आहे असे म्हणतात, रिक्षासारखं असे विचारताच उद्धव ठाकरे म्हणाले की, तीन चाकी सरकार आहे, पण ते गरीबांचं वाहन आहे. बुलेट ट्रेन की रिक्षा यात निवड करायची झाली तर मी रिक्षाच निवडेन. मी गरीबांच्या माने उभा राहीन. ही माझी भूमिका मी बदलत नाही. मी मुख्यमंत्री झालो म्हणून मी बुलेट ट्रेनच्या मागे उभा राहीन, असा समज कुणी करून घेऊ नये. माझं मत मी लोकांच्या सोबत असल्याने बुलेट ट्रेन नको असंच आहे. या सरकारला तीन चाकं, तीन चाकं म्हणून म्हणून संबोधताय, पण ही तीन चाकं चालताहेत ना एका दिशेने मग तुमच्या पोटात का दुखतंय. केंद्रात किती चाकं आहेत. आमचं तर हे तीन पक्षांचं सरकार आहे. केंद्रात किती पक्षाचं सरकार आहे. सांगा ना, मी जेव्हा गेल्या वेळी एनडीएच्या बैठकीला गेलो होतो तेव्हा तर 30-35 चाकं होती. म्हणजे रेल्वेगाडी होती.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, आता कुठे आमचं गाडं रुळावर येतंय. आता आमची रिक्षा व्यवस्थित चालायला लागलेली आहे. स्टिअरिंग माझ्या हातात आहे. पाठीमागे दोघे बसले आहेत.