मुंबई : राज्यातील महामारीची दुसरी लाट आटोक्यात आल्याने, राज्यातील अनेक जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. दुसरीकडे, लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राज्य सरकार संपूर्ण लॉकडाऊन उठवण्याच्या दृष्टिकोनातून काळजीपूर्वक निर्णय घेत आहे. तसेच शाळा, कॉलेज सुरु करण्यासाठी देखील राज्य सरकारकडून सावध पावलं उचलली जात आहेत.
उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधींना सांगितली ‘मनातली गोष्ट’! राऊतांचा गौप्यस्फोट
या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महामारीच्या तिसऱ्या लाटेबद्दल मोठं विधान केलं आहे. “अर्थचक्र सुरळीतपणे सुरु राहावं, म्हणून निर्बंध शिथिल केले गेले आहेत, हे विसरू नका! कोणत्याही चिथावणी आणि आमिषाला बळी पडू नका! स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याला धोका निर्माण करून घेऊ नका! या काळात कुठल्याही प्रकारचे राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम आयोजित करणं, आरोग्याच्या दृष्टीने महागात पडू शकते,” असं आवाहन त्यांनी कोविड केंद्राचं उद्घाटनाच्या वेळी केलं आहे.
न्यायासाठी संजीवनी काळेंनी ठोठावले ‘कृष्णकुंज’चे दरवाजे, घेतली शर्मिला ठाकरेंची भेट!
तसेच, “महामारीचं संकट गेलेलं नाही. आपण अशाच पद्धतीने गर्दी करत राहिलो, नियमांचं उल्लंघन करत राहिलो, तर ही तिसरी लाट अपेक्षेपेक्षा आधी येईल. गेल्या वेळीपेक्षा आपल्याकडे असलेल्या ऑक्सिजनच्या साठ्यात विशेष काही वाढ झालेली नाही. त्यामुळे एकीकडे रुग्ण वाढले आणि असलेल्या साठ्यापर्यंत पोहोचलो, तर आपल्याला कदाचित लॉकडाऊनचा विचार करावा लागू शकतो”, असा इशारा त्यांनी दिला आहे.
राज्यात शुक्रवार दिवसभरात ६ हजार ३८४ रूग्ण करोनातून बरे झाले, तर ४ हजार ३६५ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६२,२१,३०५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९६.९७ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६४,१५,९३५ झाली आहे. तर, आजपर्यंत राज्यात १३५६७२ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे.
Read Also :
- भाजप नेते रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्यावर गुन्हे दाखल करा – इम्तियाज जलील
- कोरोना मधून जगायचं, महागाईमध्ये मरायचं; दरवाढी विरोधात पुण्यात राष्ट्रवादीचे जागरण गोंधळ आंदोलन
- रोहित पवारांनी राज ठाकरेंचे ‘कौतुक’ करत काढला भाजपला चिमटा, म्हणाले…
- भाजपच्या ‘जन आशिर्वाद’ यात्रेची पोलखोल करणार; राष्ट्रवादीने दंड थोपटले
- “भाजपाचं म्हणजे, मी नाही त्यातली आणि…”, पिंपरी-चिंचवड पालिका भ्रष्टाचारावरून शिवसेनेचा खोचक टोला!