शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे. मुलाखतीमध्ये ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील आमदार फंड दिल्लीत दिला आहे. ते सर्व गोष्टी दिल्लीतच करत आहेत. त्यांना दिल्लीचीच चिंता आहे, असा टोला त्यांनी लगावला.
राऊत यांनी फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याबाबत आठवण करून दिल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, तिथली कोरोनाची परिस्थिती बघत होते ते. त्यांनी त्यांचा जो महाराष्ट्राचा फंड आहे तो दिल्लीत दिल्ल्याने ते सगळ्या गोष्टी दिल्लीत जाऊन करतात. राज्यातील भयावह परिस्थितीचे अपडेट्स त्यांनी प्रधानमंत्र्यांनाही भेटून देणे हे कितपत योग्य आहे?, असा सवालही त्यांनी केला.