औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांचा औरंगाबाद दौरा, त्यांच्याच एकामागोमाग एक धक्कादायक विधानांनी चर्चेत आला असताना, आता यात भर म्हणून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील एक वक्तव्य करून धुरळा उडवून दिला आहे. आज मुख्यमंत्री आणि रावसाहेब दानवे, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या जि.प. वास्तूच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने एकाच मंचावर होते.
‘आजी-माजी आणि एकत्र आलो तर…’, मुख्यमंत्र्यांनी दिले युतीचे संकेत?
यावेळी, आधी मुख्यमंत्र्यांनी भाषणाला सुरुवात करताना, ‘व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माजी आणि भविष्यात एकत्र आले तर भावी सहकारी” असं म्हटल, यांनतर चर्चांना एकच उधाण आलं. दरम्यान, कार्यक्रमानंतर दानवे यांनीही मोठं विधान करत, ‘काँग्रेसवाले खूप त्रास देतात, एकदा या, आपण बसून बोलू, असं मुख्यमंत्र्यांनी मला कानात सांगितलं आहे, ‘असा गौप्यस्फोट केला आहे. तसेच, यावेळी बाळासाहेब थोरातही तिथे होते. त्यांनी हे ऐकलं आणि तेही हसले,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
“माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेल”
‘भाजप-शिवसेना पूर्वीचे मित्र होते. पण शिवसेनेने राष्ट्रवादी-काँग्रेससोबत घरोबा केला. असं असलं तरी त्यांनी तयारी दाखवली तर भाजप समविचारी पक्षाचं स्वागतच करेल. आम्ही पुन्हा मित्र होऊ शकतो. संसारात काहीतरी घडल्याशिवाय माणूस बोलत नसतो. मुख्यमंत्र्यांना आमचाही आणि आता त्यांचाही अनुभव आहे. राज्यातल्या दोन्हीही मतदारांना त्यांचं तिकडे जाणं पसंत पडलेलं नाही, त्यांना अजूनही वाटतंय त्यांनी इकडे यावं,’ असं दानवे म्हणाले.
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापालथ? संभाजी ब्रिगेड-भाजप युतीचे संकेत!
यावेळी, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची दानवेंनी मुख्यमंत्र्यांसमोर फिरकी घेतली, ‘सिलोड जिल्हा झाला नाही तर सत्तार यांना मतदान करू नका, बघू मग लोक कुणाचं ऐकतात,’ असं म्हणल्यावर सत्तारही हसले. दानवे यांनी नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनसाठी मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देण्याची विनंती केली. तेव्हा, ‘राज्याची राजधानी-उपराजधानी जोडणार असेल तर मी तुम्हाला शब्द देतो, मी तुमच्यासोबत आहे,’ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दानवेंना दिलं. दरम्यान, नेत्यांच्या अशा विधानांमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Read Also :
- पूरग्रस्तांना जाहीर केलेली मदत तातडीने मिळावी, काँग्रेस पदाधिकाऱ्याची पटोलेंकडे मागणी
- आरक्षणाचा अध्यादेश न्यायालयात टिकला नाही तर ओबीसींच्या डोळ्यात धुळफेक ठरेल
- महापालिकेवर ‘मनसे राज’ आणण्यासाठी राज ठाकरे पुन्हा एकदा नाशिक दौऱ्यावर
- शिवसेनेला पडली मोठी खिंडार: ७ नगरसेवक फोडले, अजून १२ जण पक्ष सोडून जाणार
- भाजप नगरसेवकांने केला महिलेचा विनयभंग? किरीट सोमय्या म्हणतात, चौकशी झाली पाहिजे