सातारा : मुख्यमंत्री, अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या भागांचा लागोपाठ दौरा करत असून, तळीये आणि चिपळूणला भेट दिल्यांनतर त्यांचा आज सातारा जिल्ह्याच्या नुकसानग्रस्त भागाचा दौरा नियोजित करण्यात आला होता. मात्र, पावसाचा फटका मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याला बसला असून, अत्यंत खराब आणि कमी दृश्यमानतेमुळे, त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे.
५ दिवसांनंतर तळीयेतील सर्च ऑपरेशन अखेर थांबलं, बेपत्तांना मृत घोषित करा! ग्रामस्थांची मागणी
मुख्यमंत्री आज कोयनानगर आणि पाटण परिसरातील पुराचा फटका बसलेल्या भागाला भेट देणार होते. तसेच, निवारा छावणीला भेट देऊन, तिथल्या नागरिकांशी संवाद साधून, त्यांची विचारपूस करणार होते. त्यांच्या मागण्या, व्यथा, भावना जाणून घेणार होते. यांनतर जिल्हा प्रशासनासोबत त्यांची आढावा बैठक होणार होती आणि त्यानंतर त्यांची पत्रकार परिषदही आयोजित करण्यात आली होती.
मात्र मुख्यमंत्र्यांनी सातारा जिल्हाधिकारी तसेच इतर यंत्रणांकडून माहिती घेऊन पूरग्रस्त नागरिकांना मदत मिळण्यात कुठलीही अडचण येणार नाही हे पाहण्याचे निर्देश दिले आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 26, 2021
सांगलीतील भिलवडी बाजारपेठेचे अजित पवारांकडून बोटीतून पाहणी; खराब वातावरणामुळे कोल्हापूर दौरा रद्द
दरम्यान, त्यांनी पुन्हा मुंबईला जाऊन, “अद्याप या भागातील पाणी पूर्णपणे ओसरलेले नाही, हवामानाचासुद्धा अडसर आहे. त्यामुळे काळजीपूर्वक बचाव कार्य करावे, पूरग्रस्तांना तातडीने अन्न, कपडे, औषधांची मदत करावी. तसेच कोविड प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने वैद्यकीय पथकांना योग्य त्या सूचना द्याव्यात. या आपत्तीमुळे कोविड रुग्णांच्या उपचाराकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका असेही त्यांनी जिल्हा प्रशासनास सांगितले आहे.
तसेच कोविड प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने वैद्यकीय पथकांना योग्य त्या सूचना द्याव्यात. या आपत्तीमुळे कोविड रुग्णांच्या उपचाराकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका असेही त्यांनी जिल्हा प्रशासनास सांगितले आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 26, 2021
तसेच, त्यांचा या भागाचा दौरा पुन्हा होणार असल्याचे देखील सांगण्यात आले असून, जिल्हाधिकारी तसेच इतर यंत्रणांकडून माहिती घेऊन पूरग्रस्त नागरिकांना मदत मिळण्यात कुठलीही अडचण येणार नाही हे पाहण्याचे निर्देश दिले त्यांनी दिले आहेत. सध्या राज्याच्या पश्चिम भागाला पूर परिस्थितीचा मोठा फटका बसला असून, यामुळे तब्ब्ल १२० च्या वर मृत्यू झाले आहेत, तर ९० हजार जणांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
Read Also :
- “चले जाव चले जाव भास्कर जाधव चले जाव”, पुण्यात भाजपचे जोडे मारो आंदोलन
- राज ठाकरेंच्या ‘त्या’ क्लीप्सनी, राज्यात नवीन राजकीय समीकरणाची शक्यता?
- ‘त्या’ घटनेवर महिलेने सोडले मौन; भास्कर जाधवांनीही दिली प्रतिक्रिया, म्हणतात…
- कोल्हापूरात पावसाच्या पाण्यानंतर आता पिण्याच्या पाण्याचे संकट; पुणे महापालिकेची मदतीसाठी धाव
- ब्रेकिंग! कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पांचा राजीनामा, भावुक होत केले मोठे विधान!