औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा चर्चेत आहे. कारण MIM, धनगर समाज, मराठा क्रांती मोर्चा आणि मनसेने या दौऱ्याला तीव्र विरोध करणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्र्यांच्या या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी, मुख्यमंत्र्यांनीच थेट युतीबद्दल वक्तव्य करून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता शिवसेना-भाजप युती पुन्हा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
“माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेल”
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड एकाच व्यासपीठावर होते. यावेळी, मुख्यमंत्री मंचावर भाषण करण्यासाठी आले असता त्यांनी, रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्याकडे पाहून, “व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माजी आणि भविष्यात एकत्र आले तर भावी सहकारी” असं म्हटल. त्यांनतर दोघांनीही त्यांना हसून प्रतिसाद दिला.
जिल्हा प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन आणि पैठण येथील संतपीठाचे उद्घाटन – LIVE https://t.co/HvCuQhfBJ2
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 17, 2021
संभाजी ब्रिगेड-भाजप युती? चंद्रकांत पाटील यांनी दिली सूचक प्रतिक्रिया!
दरम्यान, त्यांच्या एकत्र येण्याच्या संदर्भात केलेल्या या वक्तव्याने आणि हे विधान रावसाहेब दानवे यांच्या समोर, त्यांच्याकडे पाहून केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगत आहेत. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष जोरदार तयारीला लागलेले असताना, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या विधानाने नक्कीच आघाडीतील इतर घटक पक्षांचे धाबे दणाणले असतील. मात्र, आता शिवसेना-भाजपची पुन्हा युती होणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे.
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापालथ? संभाजी ब्रिगेड-भाजप युतीचे संकेत!
दुसरीकडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील, ‘माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेल’ असं वक्तव्य केलं होतं. देहूतील एका कार्यक्रमात मंचावरून एकाने चंद्रकांत पाटील यांचा अनेक वेळा उल्लेख ‘माजी मंत्री’ म्हणून केला. तेव्हा त्यांना उद्देशून त्यांनी, ‘माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल,’ असं सूचक विधान केलं होतं. त्यानंतर आता मुख्यमंत्र्याच्या विधानाने राजकीय पडद्यामागे शिजतंय तरी काय? हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्याचे संकेत आहेत का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
Read Also :
- पूरग्रस्तांना जाहीर केलेली मदत तातडीने मिळावी, काँग्रेस पदाधिकाऱ्याची पटोलेंकडे मागणी
- आरक्षणाचा अध्यादेश न्यायालयात टिकला नाही तर ओबीसींच्या डोळ्यात धुळफेक ठरेल
- महापालिकेवर ‘मनसे राज’ आणण्यासाठी राज ठाकरे पुन्हा एकदा नाशिक दौऱ्यावर
- शिवसेनेला पडली मोठी खिंडार: ७ नगरसेवक फोडले, अजून १२ जण पक्ष सोडून जाणार
- भाजप नगरसेवकांने केला महिलेचा विनयभंग? किरीट सोमय्या म्हणतात, चौकशी झाली पाहिजे