कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने कोकण आणि प.महाराष्ट्रात आलेल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एकापाठोपाठ एक दौरे करत आहेत. आज ते कोल्हापुरात आहेत. यावेळी त्यांनी शिरोळ येथील नृसिंहवाडी गावाला भेट दिली आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील त्याच ठिकाणी होते. कोल्हापुरातील शाहूवाडी चौकात हे दोन्ही नेते आमने-सामने आले आणि दोन्ही नेत्यांनी मिळून नुकसानीची पाहणी केली.
फडणवीस-ठाकरे आले पुन्हा एकत्र, अवघ्या ५ मिनिटांच्या चर्चेत दडलंय तरी काय?
यांनतर, मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत, “फडणवीस यांना भेटलो आणि बोललो. मुंबईत आम्ही परत एकदा सर्वाना बोलावून पुर परिस्थितीत सर्वांना कशी मदत करता येईल ते पाहू. मी इथे आलो आहे तर प्रशासनही आमच्या बरोबर गुंतले आहे, माझी विनंती आहे की, कुणी आता पुरग्रस्त भागाचा दौरा करून प्रशासनाला अडकवून ठेवू नये. एनडीआरएफचे निकष २०१५ चे आहेत, जुने आहेत. ते बदलण्याची गरज आहे असे आम्ही केंद्राला विनंती केली आहे,” असे सांगितले.
कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
तसेच, “मी वेड्यावाकड्या मागण्या केंद्राकडे करणार नाही. सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा करणार नाही. तात्पुरती मदत तातडीने सुरू केली आहे. जेव्हा गरज असेल तेव्हा केंद्राची मदत पण घेऊत . मी केंद्रीय वित्तमंत्री सितारामन यांना विनंती केली आहे की त्यांनी विमा कंपन्यांना महसूल विभागाचे पंचनामे ग्राह्य धरून किमान ५० टक्के विमा रक्कम द्यावे असे निर्देश द्यावेत. ०१९ मधल्या पुरामधील नुकसान भरपाईचा मोबदला आमचे सरकार सत्तेवर आल्यावर देणे सुरू झाले आहे,” अशी टीका त्यांनी केली.
फडणवीस सरकारची चुक अजितदादांनी निस्सारली, २३ गावांच्या निर्णयाचे स्वागतच – प्रशांत जगताप
“गेल्या काही वर्षात आपण वेगवेगळ्या आपत्तींना तोंड देत आहोत. आपली प्राथमिकता ही लोकांचे जीव वाचवणे ही आहे, महापुरानंतर रोगराई होण्याची शक्यता,हे आस्मानी संकट भयानक, कायमस्वरुपी तोडगा काढण्याची नागरिकांची मागणी आहे. पुराच्या संकटावर तोडगा काढण्यासाठी काम करणे गरजेचे असून, पूर बाधित नागरिकांचं पुनर्वसन करणे, यासाठी आराखडा करणे, पूर बाधित भागातील अतिक्रमणे काढणे, यासाठी कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे,” असा सूचक इशारा त्यांनी दिला.
पंकजांसोबत आजही बहिणीसारखं नातं; फडणवीसांच्या विधानावर, पंकजा मुंडे म्हणतात…
“अतिवृष्टीचा इशारा मिळाल्यावर स्थानिक प्रशासनाने काही लाख नागरिकांचे स्थलांतर करून जीव वाचवले. पशुधनही त्याचप्रकारे वाचवण्यात आलं. महाराष्ट्रावर कोसळलेले हे अस्मानी संकट भयानक आहे. या संकटातून बाहेर पडताना कोविड तसेच पुराच्या पाण्यामुळे होऊ शकणारी रोगराई रोखण्यासाठी साफसफाई करणं, नागरिकांना दिलासा देणं, त्यांचं पुनर्वसन करणं यास आमचं प्राधान्य आहे. हे संकट नेहमीचंच झालं आहे आणि त्यात आमचे संसार वाहून जात आहेत, तेव्हा त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे,” असं त्यांनी सांगितलं.
‘’मुख्यमंत्री बाळासाहेबांचे वंशज, आमचं म्हणणं जरुर ऐकतील’’, कोल्हापूरकरांची आर्त हाक
“नद्या फुगल्यामुळे येणाऱ्या अतिरिक्त पाण्याच्या नियोजनाचा आराखडा करून काम सुरू केलं जाणार आहे. कोसळणाऱ्या दरडी, खचणारे रस्ते लक्षात घेता भूगर्भाचा अभ्यास करून त्याबाबतीत काही उपाययोजना केली जाणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूरबाधित क्षेत्रातील तसेच दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या वस्त्यांचेही चांगल्या पद्धतीने पुनर्वसन करण्यावर आमचा भर आहे. हे साध्य करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील. नदीपात्रातली अतीक्रमणे, बांधकामांना परवानगी न देण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. या पुराचं भीषण वास्तव जवळून पाहिल्यानंतर त्यासंदर्भातील कामाला, आराखड्याला गती दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही,” असा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
Read Also :
- अखेर पुण्याच्या पीएमआरडीए विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांची मंजूरी; २३ गावांच्या विकासाचा मार्ग सुकर
- फोन टॅपिंग: ‘रश्मी शुक्ला यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती का?’
- आपलाच पेपर अन् आपलीच जाहिरात; ८८ पानी पेपर छापून सामनाने मुख्यमंत्र्याच्या आवाहनाला दाखवली केराची टोपली
- मोठी बातमी: राजकीय हालचालींना वेग, प्रशांत किशोर बनणार सोनिया गांधींचे सल्लागार?
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर; पूरग्रस्त भागाची करणार पाहणी!