लॉकडाऊन न केल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीस जिल्हाधिकारी हेच जबाबदार राहतील, असा इशारा खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिला आहे. नगरमध्ये आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
डॉ. विखे म्हणाले, नगर शहरासह जिल्ह्यात सुरुवातीला दहा रुग्ण होते. ते आता हजाराच्यावर गेले आहेत. कोरोनाचा इतक्या झपाट्याने प्रसार होत आहे की परिस्थिती वेळीच नियंत्रणात न आल्यास मोठे तांडव निर्माण होऊ शकते. त्यामुळे एक डॉक्टर म्हणून माझे असे मत आहे की, जिल्हा प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन पाच ते दहा दिवसांचा लॉकडाऊन करावा. प्रशासनाने निर्णय न घेतल्यास यामुळे होणाºया मृत्यूस जिल्हाधिकारी राहुल दिवेदी हे जबाबदार राहतील.
सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेला डॉ. विखे यांच्यासोबत आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे आदी उपस्थित होते